शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

कोकण, कर्नाटकी हापूसला मागणी

By admin | Published: March 28, 2017 5:31 AM

सर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते.

प्राची सोनवणे / नवी मुंबईसर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात ६७ हजार ३९२ क्रेट आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. दिवसाला ३१३ ट्रक आणि टेम्पोची आवक होत असून यामध्ये कोकण आणि कर्नाटकी आंब्याचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असला तरी आंब्याची चव चाखण्यासाठी मात्र ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून अपेक्षित मागणी होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ४० हजार पेट्यांची आवक झाली होती, यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून ६७ हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरापासूनच बाजारातील आवक वाढली असून कर्नाटकी तसेच कोकणातील हापूस, बदामी, पायरी, तोतापुरी, केसर, लालबाग यांनाही मागणी आहे. वाशीतील घाऊक बाजारपेठेत कर्नाटकी हापूस ५० ते १०० रुपये किलो या दराने आहे. कोकणातील हापूस आंबा ९० ते २०० रुपये, बदामी ४० ते ६० रुपये किलो, लालबाग २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी १५ रुपये किलो आणि केसर १०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे.दर स्थिर राहणार नोटाबंदीचा परिणाम बाजारातील व्यवहारांवर असला तरी देखील आंब्याची मागणी मात्र घटलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर राहणार अशी माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.