शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट, सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस संस्थेचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 1:39 AM

‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या.

वैभव गायकरपनवेल : ‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. अखेर हे वादळ गुजरातकडे सरकल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या वादळामुळे सकारात्मक बाब पुढे आली आहे. ओखी वादळाच्या आगमनाने नवी मुंबईमधील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस या केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या संस्थेने केलेल्या हवेतील मोजमापाच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई, पनवेल दोन्हीही पालिका क्षेत्र याठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीत स्थिती आणखीनच बिकट आहे. या प्रदूषणाविरोधात अनेक रहिवासी संघटना लढा देत आहेत. खारघर आणि तळोजा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन वी वॉन्ट क्लीन एअर (आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवसाचे हवेतील प्रदूषण याबाबत माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकारच्याच नियंत्रणात असलेली सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस ही संस्था संपूर्ण देशभरात प्रदूषणाच्या पातळीबाबत मोजमाप करून, ती माहिती सार्वजनिक करते. इंडियन एअर क्वालिटी सर्व्हिस या अ‍ॅपवर आपल्याला ही माहिती मिळते. ‘ओखी’ वादळापूर्वी म्हणजेच ४ डिसेंबर आधी नवी मुंबईमधील हवेतील प्रदूषणाची पातळी ही खूप वाईट अवस्थेत होती.

या संस्थेने केलेल्या मोजमापानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) हे ३१० एवढे होते, तर ५ डिसेंबरला नवी मुंबईत ‘ओखी’मुळे वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळानंतर दुसºया दिवशी ६ डिसेंबरला प्रदूषणाचा आढावा घेतला असता प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. या संस्थेच्या माहितीनुसार एअर क्वालिटी इंडेक्सवर बुधवारी १९८ एवढी नोंदवली गेली. त्यामुळे आजची प्रदूषणाची पातळी ही येथील रहिवाशांच्या दृष्टीने समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

खारघरमधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी यासंदर्भात रोजच्या हवेतील पातळीची माहिती घेतली. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे संपूर्ण नवी मुंबईमधील प्रदूषणाची प्रत्येक दिवसाची माहिती आहे. मात्र, ‘ओखी’नंतर प्रथमच नवी मुंबईत अशा प्रकारची शुद्ध हवा वाहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे वादळात मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होत असतो त्यामुळेच नवी मुंबईत हा फरक जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.