शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नुकसान मुंबईतल्या कांदळवनाचे, झाडांची भरपाई मात्र गडचिरोलीत

By नारायण जाधव | Updated: December 2, 2023 08:13 IST

Mumbai News: मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे होणारे १२.७८०८ हेक्टर कांदळवनाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राने भरपाई म्हणून ९०० किलोमीटर दूरवर असलेल्या गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या हा ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’ निर्णय आता अडचणीत आला आहे.

बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या रेेल्वे लाइन्ससाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाचे सहायक वन महानिरीक्षक सी. बी. तहसीलदार यांनी १७ नोव्हेंबरला ही तत्त्वत: मान्यता दिली. असा ‘अविचारी’ आदेश जारी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये, सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडमध्ये बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या भरपाईसाठी एमओईएफसीसीने जळगावच्या एका गावात परवानगी दिलेली आहे.

गडचिरोलीतील डीग्रेडेड वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यास आमची काहीच हरकत नाही, खरे पाहिले तर हे करणे गरजेचे आहे. परंतु, कांदळवन नष्ट करण्याच्या बदल्यात हे करण्याची गरज नाही, असे सांगून कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गाच्या जैवविविधतेत निराळ्या भूमिका बजावत असून, त्यांच्याकडून त्यांच्या नैसर्गिक गुणांची अदलाबदल होणे असंभव आहे.- नंदकुमार पवार, प्रमुख, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान

‘हा कांदळवन नष्ट करण्याचाच प्रकार’नवी मुंबईतील पर्यावरणवादी नाटकनेक्ट फाउंडेशनचे प्रमुख बी. एन. कुमार यांनी १२ हजारांहून अधिक खारफुटीचे डायव्हर्जन करणे म्हणजे कांदळवन नष्ट करण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारे त्याची भरपाई म्हणून ९०० किमी दूरवर वृक्षारोपणाद्वारे नुकसान भरून काढणे खूपच निरर्थक असल्याचे कुमार म्हणाले. अशा भरपाईमुळे गडचिरोलीच्या जंगलात मासे आणि खेकड्यांची पैदास होऊ शकते का आणि मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानीची भरपाई गडचिरोलीत कशी काय होऊ शकते, असे प्रश्न कुमार यांनी केले आहेत.

बाळकूम-गायमुखचे वृक्षारोपण चंद्रपूर जिल्ह्यातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या ठाण्यातील बाळकूम ते गायमुख या १३.२१५ किमीच्या सहापदरी सागरी रस्त्याच्या बांधकामात १२.२६०७ हेक्टर वनजमीन लागणार आहे. ती वळती करण्यास वने आणि पर्यावरण मंत्रालयाने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी दिल्याने ठाणे महापालिकेसह एमएमआरडीएला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या वन जमिनीच्या नुकसान भरपाईच्या बदल्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील कुकूधेती गावातील १५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईforestजंगलGadchiroliगडचिरोली