शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

धूलिकणांमुळे शहरवासी हैराण; प्रदूषणामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:44 IST

आरोग्यावर परिणाम; विकासकामांमुळे धुळीचे साम्राज्य

- नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमधील नागरिक वायूप्रदूषणामुळे त्रस्त होऊ लागले आहेत. धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम सहन करावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशातील पहिल्या स्मार्ट सिटीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. सिडकोने यापूर्वीच पनवेलसह दक्षिण नवी मुंबईच पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली होती. ‘नैना’ परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. देशातील राहण्यायोग्य शहरामध्येही नवी मुंबईचा समावेश झाला असून, स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावर सातवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. शहरात सर्व काही चांगले असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात प्रदूषणाची स्थिती गंभीर होऊ लागली आहे.खाडी प्रदूषित होत आहे. कारखान्यांमधील पाणी नाल्यात सोडले जात आहे. पनवेल परिसरामध्ये सांडपाणी चक्क नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रदूषणामध्ये आता वायू प्रदूषणाचाही समावेश आहे. दोन्ही महापालिका व औद्योगिक क्षेत्रामध्ये धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. ऐरोली परिसरामध्ये ३१ पैकी २० दिवस धूलिकणांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. हवेतील आरएसपीएम १० ची मात्रा सरासरी १०० घनमीटर असणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश ठिकाणी ती ११० ते १४० पर्यंत गेली आहे.शहरामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे. पनवेल परिसरामध्ये विमानतळासाठी भरावाचे काम वेगाने सुरू आहे. भरावामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल ते उरण महामार्गाचे रुंदीकरणही सुरू आहे. याशिवाय रस्ते, गटार व इमारतींचे बांधकामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महामार्गासह एमआयडीसीमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आहे. धूळ साफ करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे वाहनांमुळे रोडवरील धूलिकण हवेत जात आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. दुचाकीवरून जाणाºया नागरिकांच्या डोळ्यात धूळ जात आहे. डोळ्यांची जळजळ होत असून अनेक वेळा धुळीचे मोठे कण डोळ्यात गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोड, ठाणे-बेलापूर व अंतर्गत रोडची यांत्रिकीपद्धतीने साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे; परंतु बहुतांश अंतर्गत रोडवर वाहने उभी असल्याने साफसफाई करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल परिसरामध्ये रोड साफ करण्यासाठी काहीही यंत्रणा नसल्यामुळे प्रदूषण वाढत असून प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.नवी मुंबई महापालिकेच्या उपाययोजनामहापालिकेने शहरातील प्रमुख रोडची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई सुरू केली आहे. दुभाजकांच्या मध्ये वृक्षलागवड व हिरवळ विकसित केली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली आहे. दगडखाणी बंद असल्यामुळे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे. ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे व नेरुळमध्ये हवा गुणवत्ता तपासणी केंद्र उभारले आहे. पालिका उपाययोजना करत आहे; परंतु सायन-पनवेल महामार्गाची साफसफाई केली जात नसल्याने धूलिकण वाढत आहेत. पनवेलमध्येही रोडच्या साफसफाईकडे फारसे लक्ष दिले जात नाही.आरोग्यावर होऊ शकतो परिणामधूलिकणांमुळे नागरिकांना श्वसनाचे व हृदयविकाराचे आजार होण्याची शक्यता आहे. जागतिक आकडेवारीनुसार धूलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुप्फुसांचा कर्करोग, श्वसननलिका, दीर्घकालीन श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढत आहे. यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई