शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबईत गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:15 IST

लॉकडाऊनचा काळ ठरला फायदेशीर : पाच महिन्यांत ७४३ गुन्ह्यांची नोंद; चोरीच्या गुन्ह्यांत घट

सूर्यकांत वाघमारे।

नवी मुंबई : कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन शहरातील गुन्हेगारीत घट होण्यास प्रभावशाली ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त व नागरिक घरातच बंदिस्त राहिल्याने गुन्हेगारांना संधी मिळालेली नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत पाच महिन्यांत गुन्ह्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

शहरात वाहनचोरी, सोनसाखळी चोरी तसेच घरफोडी हे गुन्हे नेहमीचेच झाले आहेत. दाट लोकवस्ती व आडोशाच्या जागा असलेल्या ठिकाणी चोरट्यांना लपायची संधी मिळत असल्याने अशा ठिकाणी सर्वाधिक चोऱ्या घडत आहेत. त्यावर पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबवूनही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अखेर कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील गुन्हेगारी बºयाच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यात चोरी, घरफोडी अशा मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांसह इतरही गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.गतवर्षी मेअखेरपर्यंत परिमंडळ एकमध्ये १०९० गुन्हे घडले होते. त्यामध्ये मालमत्तेशी संबंधित ५२३ गुन्ह्यांचा समावेश होता. तर महिला अत्याचार व छळवणुकीचे १३९ गुन्हे घडले होते. परंतु चालू वर्षात मेअखेरपर्यंत ७४३ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये मालमत्तेविषयीचे ३४४ तर महिलांविषयीचे ९९ गुन्हे आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीतलेच आहेत. त्यानंतर अद्यापपर्यंत शहरात लॉकडाऊनमुळे पोलिसांची गस्त व आवश्यक ठिकाणी बंदोबस्त असल्याने गुन्ह्यांना आळा बसला आहे.मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन असतानादेखील रात्रीच्या वेळी काही ठिकाणी चोरट्यांकडून गुन्ह्याच्या उद्देशाने टेहळणी सुरू असल्याचेही प्रकार समोर आले होते. परंतु तुरळक घटना वगळता चोरी अथवा घरफोडीच्या अधिक घटना घडल्या नाहीत.चालू वर्षात मेअखेर पर्यंत एकूण ७४३ गुन्हे घडले आहेत. गतवर्षी याच पाच महिन्यात १,०९० गुन्हे घडले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊन दरम्यानचा बंदोबस्त व इतर कारणांनी गुन्ह्यात घट झाली आहे.- पंकज डहाणे,उपायुक्त - परिमंडळ १ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी