शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चाचणीसाठी होणारा विलंब थांबणार; दोन दिवसांत मिळणार कोरोनाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 04:13 IST

महापालिकेने केला खासगी लॅबशी करार

नवी मुंबई : कोरोना चाचणीसाठी लागणारा विलंब यापुढे थांबणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने खासगी लॅबशी करार केला असून, यापुढे एक ते दोन दिवसांत अहवाल उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १३ मार्चपासून शहरातील २१,३२९ जणांची स्वॅब तपासणी केली आहे. यापैकी १९,८४३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, अद्याप १,४८६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे उपचार सुरू करण्यासही विलंब होत आहे. यापूर्वी वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी अहवाल मिळाला आहे. ५ ते १५ दिवस अहवाल मिळाला नसल्याचीही उदाहरणे आहेत. नेरुळमधील एक युवतीचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाला. अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु तोपर्यंत ती युवती पूर्णपणे बरी झाली होती. या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये आरोग्य विभागाविषयी नाराजी वाढू लागली होती. ही समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कृष्णा डायग्नोसिस या खासगी लॅबशी करार केला आहे. यामुळे आता एक ते दोन दिवसांत स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. सदर लॅब त्यांच्या सीएसआर निधीतून शासनमान्य दरामध्ये महानगरपालिकेस सवलत देणार आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या कराराप्रमाणे सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच कोविड रुग्णालयीन सुविधांपासून प्रतिदिन ५०० स्वॅब नमुने घेऊन जाण्याचे मान्य केले आहे.

महानगरपालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. संशयितांची शीघ्र तपासणी करण्यासाठी ४० हजार अँटिजन किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत, ज्यामधून पॉझिटिव्ह व्यक्तींचे अहवाल त्वरित प्राप्त करून घेणे शक्य होणार आहे. मेट्रोपोलीस लॅबने १५ हजार स्वॅब तपासण्या मोफत करून देण्याचे मान्य केले असून, त्यांच्याकडूनही काही चाचण्या करून घेतल्या जात आहेत.वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी अहवाल मिळाला आहे. ५ ते १५ दिवस अहवाल मिळाला नसल्याचीही उदाहरणे आहेत. नेरुळमधील एक युवतीचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाला. अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु तोपर्यंत ती युवती पूर्णपणे बरी झाली होती. या घटनांमुळे नागरिकांत आरोग्य विभागाविषयी नाराजी वाढू लागली होती. यापार्श्वभूमीवर आयुक्त मिसाळ यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस