शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Coronavirus, Lockdown News: कोरोनाचा विळखा: एपीएमसीतील आवक सलग तिसऱ्या दिवशीही घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:52 AM

बाजार समितीत आतापर्यंत ३३ जणांना लागण; व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून तीन दिवसांपासून आवक सातत्याने घटली आहे. व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेकांनी घरी थांबणे पसंत केले आहे.

बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये आतापर्यंत ३३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मार्केटच्या गेटबाहेर किरकोळ विक्रेते व रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे २५ जणांना प्रादुर्भाव झाला असून एपीएमसी संबंधित रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. यामध्ये व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, कँटीनमधील कामगार व व्यापाºयांच्या कार्यालयात काम करणाºयांचाही समावेश आहे.

मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्ण वाढू लागल्यानंतर ही सर्व मार्केट बंद ठेवण्याऐवजी रुग्ण सापडलेली विंग सील केली जात आहे. रुग्णांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयास लागण झाल्यानंतर अनेक सुरक्षा कर्मचाºयांनी सुट्टी घेतली आहे. व्यापारी व कामगारांनीही सुट्टी घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी केवळ ११३ गाड्या आल्या आहेत. तर चार मार्केटमध्ये मिळून फक्त ५७० वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली असून ५० टक्के आवक घटली आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांत पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजीपाला व्यापाऱ्यांचे आवाहनभाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर व्यापाºयांनी सोशल मीडियावरून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या गाळ्यांतरुग्ण सापडले आहेत तेथील व्यापार थांबविला आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनीही मार्केटमध्ये येणेथांबवावे. स्वत: ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या