शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 4:32 AM

35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी हात पुढे करून नवी मुंबईकरांनी आदर्श निर्माण केला आहे. तर कोविड योद्ध्यांनीही बाधितांना धीर देऊन कोरोनावर मात करण्याचे बळ दिले. त्यामुळे अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात केलेली आहे.२३ मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दुसऱ्याच दिवसापासून शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले.

यादरम्यान एकट्या राहणाºया व्यक्तींसह चाकरमानी, झोपड्यांतील कुटुंबे अशा असंख्य व्यक्तींपुढे पोटाची खळगी भरवण्यासह इतरही गरजा निर्माण झाल्या होत्या. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाहता पाहता शेकडो नागरिकांनी व सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. आलेल्या संकटावर मात करत त्यांच्याकडून गरजूंपर्यंत मदत पोचवली जात होती. त्यामध्ये अन्न धान्यासह कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. त्याशिवाय रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय मदत पुरवण्याचेही काम अनेकांनी केले. त्यात पोलीस व पालिकाही आग्रही होती. पालिकेकडून नियमाने दररोज सुमारे ३५ हजार जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. त्याकामी अनेक ठिकाणच्या गुरुद्वार व तिथल्या यंत्रणा उपयुक्त ठरली. तर काही संघटनांची मनुष्याप्रमाणेच प्राण्यांना जीवदान देण्याचे काम या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रामाणिकपणे केले. लोकप्रनिधींनी, वैद्यकीय संघटनांनी देखील आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभागात वाटून नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचा प्रयत्न केला. तर एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांनी पालिकेला उपयुक्त साहित्य पुरवून गरजूंना सुरु असलेल्या मदतीत खंड पडू दिला नाही.

लॉकडाऊन दरम्यान कुठेही नियमांचे उल्लंघन अथवा इतर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त होता. एकीकडे कर्तव्य बजावत असतानाच दुसरीकडे गरजूंना मदतीचा हात दिला जात होता. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्या याठिकाणी तयार अन्न वाटताना खाकीतली माणुसकी दिसत होती. तर पालिकेचे सफाई कामगार, अग्निशमन दल व वैद्यकीय पथक हे खºया अर्थाने कोविड योद्धा बनले होते. कोरोनाबाबत गैरसमज असल्याने नागरिक भयभीत होत होते. अशावेळी दाखल रुग्णांना उपचारास धीर देण्याचे काम वैद्यकीय पथक करत होते. त्यामुळे उपचार घेऊन ३ हजार ६०० हून अधिक जण बरे झाले आहेत.35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर घणसोलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती झाली. 1,300 पैकी ११०० हून अधिक वृद्धांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस