शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

coronavirus: नवी मुंबईतील ८५० पोलीस कोरोनामुक्त, एकमेव कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:09 IST

राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनावर मात करण्यात नवी मुंबईपोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे.राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, नवी मुंबई पोलीस दलात सुमारे ४,५०० अधिकारी व कर्मचारी आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे सुमारे ८५० पोलीस व त्यांचे सुमारे ५०० नातेवाईक कोरोनामधून सुखरूप बाहेर येऊ शकले आहेत.नवी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त सुरू असताना, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आलेली आहे. मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील, विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नियोजनाखाली ही टीम कार्यरत आहे. त्यामध्ये आठ ते दहा निरीक्षकांच्या समावेश आहे. एकाद्या अधिकारी अथवा कर्मचाºयाला कोरोना होऊन प्रकृती खालावल्यास उपचारासाठी डॉ.डी.वाय. पाटील, तसेच इतर रुग्णालयात सोय करण्यात आली आहे, तर क्वारंटाइन व किरकोळ उपचारासाठी नेरुळ व कळंबोली येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या तेथे सुमारे १५० पोलिसांवर उपचार सुरू आहेत.रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास कोरोना होऊन जिवाला धोका उद्भवू शकतो. यामुळे मार्च महिन्यातच नवी मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तातून वगळण्यात आले. त्याशिवाय जे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करत आहेत, त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, तसेच काढा पुरविण्यात आला. यामुळे सतत बंदोबस्तावर राहून अनेक जण कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत.वेलनेस टीमचे असे चालते कामएखाद्या कर्मचाºयाला लागण झाल्यास तो पूर्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत वेलनेस टीम पाठपुरावा करते. त्याकरिता रोज डॉक्टरांसोबत सुसंवाद साधला जाऊन प्रत्येक पोलिसांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. एखाद्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार दिले जात आहेत.या दरम्यान कोणाला आवश्यक औषधांची कमी भासणार नाही, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. शिवाय कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकाची वरिष्ठांकडून चौकशी केली जात असल्याने, त्यांनाही दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस