शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Corona Vaccination: नवी मुंबईमध्येही कोरोना लसीचा तुटवडा; ४२ पैकी ३८ केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:37 IST

नवीन डोस मिळाले तरच शुक्रवारी लसीकरण

नवी मुंबई : शहरामध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरूवारी फक्त ३५१० डोस शिल्लक असल्यामुळे ४२ पैकी ३८ केंद्र बंद करावी लागली होती. नवीन डोस उपलब्ध झाले तरच शुक्रवारी लसीकरण सुरु ठेवता येणार आहे.            नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेने तब्बल ४२ केंद्र सुरु केली होती. यामध्ये २६ महानगरपालिकेची व १६ खासगी रुग्णालयांमधील केंद्रांचा समावेश होता. बुधवारी रात्रीपर्यंत शहरातील १ लाख ४१ हजार ७९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. मनपाकडे फक्त ३५१० डोस उपलब्ध होते. गुरूवारी सकाळी डोस उपलब्ध असलेल्या मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, दुपारनंतर जवळपास ३८ केंद्रांमधील लस संपल्यामुळे ती बंद करण्यात आली. मनपाच्या वाशी, ऐरोली, नेरूळ व वाशीतील जम्बो केंद्रात सायंकाळपर्यंत लसीकरण सुरू होते. महानगरपालिका प्रशासनाने लसीचे डोस उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत नवीन डोस मिळाले तरच लसीकरण सुरू ठेवता येणार आहे. अन्यथा सर्व केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरण वेगाने होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी अनेक नागरिक महानगरपालिका व खासगी सेंटरमध्ये लस घेण्यासाठी व नोंदणीसाठी जात होते. परंतु, तेथे लस नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे नाराज होऊन परत जावे लागत होते.नागरिकांमध्ये असंतोषनवी मुंबईमध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गुरुवारी अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत घरी जावे लागले. नवीन लस कधी येणार, याविषयीही ठोस माहिती दिली जात नव्हती. यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणामध्ये खंड पडून देऊ नये. पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस