शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:48 AM

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूरकरांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

पनवेल : सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूरकरांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. खारघर येथील जी. डी. पोळ कॉलेजमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या नवी मुंबई, पनवेल येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी काय काय करायला पाहिजे याची माहिती उपस्थितांना दिली. २५ वर्षांपूर्वी सोलापूर हे राज्यात चौथ्या क्र मांकाचे शहर होते. पंढरपूर येथील देशपातळीवरील सर्वात मोठे देवस्थान हे सोलापुरात आहे. तसेच सोलापुरातील ज्वारी, शेंगदाणा चटणी, चादर, साखर कारखाने, डाळिंब महाराष्ट्रासह जगभरात प्रसिद्ध आहेत. या सर्वांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांचाच हातभार लागणे आवश्यक असून त्यासाठी संघटित होवून काम करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. सोलापूर सोशल फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य धनराज गरड यांच्या पुढाकाराने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी उपस्थित होते.विशेषत: आयपीएस अशोक दुधे, आयपीएस विश्वास पांढरे, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दाजी भाकरे, जी. डी. पोळ फाउंडेशनचे अध्यक्ष जी. डी. पोळ, सतीश बागल, सुनील चव्हाण, लीना अर्जुन गरड, आरती नवघरे उपस्थित होते.