शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

वापराविना दोन्ही विद्युत शवदाहिन्या बंद; नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:40 IST

दोन्ही दाहिन्या सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या विद्युत शवदाहिन्या वापराविना बंद पडल्या आहेत. परिणामी एनआरआय येथील एका कुटुंबाला त्यांच्या मयत व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पनवेलमधील विद्युत दाहिनीचा वापर करावा लागला. या प्रकारावरून नागरिकांमध्ये जनजागृती करून दोन्ही शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

मयत व्यक्तींचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या लाकडांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे दोन विद्युत शवदाहिनी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत शवदाहिनीत मृतदेह जाळण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींच्या नातेवाइकांकडून विद्युत शवदाहिनीकडे पाठ फिरवली जात आहे. परिणामी दोन्ही विद्युत शवदाहिन्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहेत. दरम्यानच्या काळात त्या डिझेलऐवजी गॅसवर चालतील असा बदल देखील करण्यात आलेला आहे. मात्र नियमित वापर होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत आहेत. अशातच सोमवारी एनआरआय येथील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी आपल्या मृतदेहावर विद्युत दाहिनीमध्येचे अंत्यसंस्कार व्हावेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली होती. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी प्रथम करावे व नंतर तुर्भेतील विद्युत शवदाहिनीबाबत चौकशी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार बंद असल्याचे समजताच त्यांना पर्यायी पनवेलमधील विद्युत शवदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याकरिता मयत व्यक्तीच्या नातेवाइकांची ससेहोलपट झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेला निवेदन देवून दोन्ही विद्युत शवदाहिन्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचीही मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेतली जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.