शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वापराविना दोन्ही विद्युत शवदाहिन्या बंद; नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:40 IST

दोन्ही दाहिन्या सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या विद्युत शवदाहिन्या वापराविना बंद पडल्या आहेत. परिणामी एनआरआय येथील एका कुटुंबाला त्यांच्या मयत व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पनवेलमधील विद्युत दाहिनीचा वापर करावा लागला. या प्रकारावरून नागरिकांमध्ये जनजागृती करून दोन्ही शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

मयत व्यक्तींचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या लाकडांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे दोन विद्युत शवदाहिनी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत शवदाहिनीत मृतदेह जाळण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींच्या नातेवाइकांकडून विद्युत शवदाहिनीकडे पाठ फिरवली जात आहे. परिणामी दोन्ही विद्युत शवदाहिन्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहेत. दरम्यानच्या काळात त्या डिझेलऐवजी गॅसवर चालतील असा बदल देखील करण्यात आलेला आहे. मात्र नियमित वापर होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत आहेत. अशातच सोमवारी एनआरआय येथील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी आपल्या मृतदेहावर विद्युत दाहिनीमध्येचे अंत्यसंस्कार व्हावेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली होती. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी प्रथम करावे व नंतर तुर्भेतील विद्युत शवदाहिनीबाबत चौकशी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार बंद असल्याचे समजताच त्यांना पर्यायी पनवेलमधील विद्युत शवदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याकरिता मयत व्यक्तीच्या नातेवाइकांची ससेहोलपट झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेला निवेदन देवून दोन्ही विद्युत शवदाहिन्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचीही मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेतली जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.