शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

वापराविना दोन्ही विद्युत शवदाहिन्या बंद; नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:40 IST

दोन्ही दाहिन्या सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या विद्युत शवदाहिन्या वापराविना बंद पडल्या आहेत. परिणामी एनआरआय येथील एका कुटुंबाला त्यांच्या मयत व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पनवेलमधील विद्युत दाहिनीचा वापर करावा लागला. या प्रकारावरून नागरिकांमध्ये जनजागृती करून दोन्ही शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

मयत व्यक्तींचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या लाकडांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे दोन विद्युत शवदाहिनी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत शवदाहिनीत मृतदेह जाळण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींच्या नातेवाइकांकडून विद्युत शवदाहिनीकडे पाठ फिरवली जात आहे. परिणामी दोन्ही विद्युत शवदाहिन्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहेत. दरम्यानच्या काळात त्या डिझेलऐवजी गॅसवर चालतील असा बदल देखील करण्यात आलेला आहे. मात्र नियमित वापर होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत आहेत. अशातच सोमवारी एनआरआय येथील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी आपल्या मृतदेहावर विद्युत दाहिनीमध्येचे अंत्यसंस्कार व्हावेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली होती. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी प्रथम करावे व नंतर तुर्भेतील विद्युत शवदाहिनीबाबत चौकशी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार बंद असल्याचे समजताच त्यांना पर्यायी पनवेलमधील विद्युत शवदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याकरिता मयत व्यक्तीच्या नातेवाइकांची ससेहोलपट झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेला निवेदन देवून दोन्ही विद्युत शवदाहिन्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचीही मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेतली जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.