शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वापराविना दोन्ही विद्युत शवदाहिन्या बंद; नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:40 IST

दोन्ही दाहिन्या सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या विद्युत शवदाहिन्या वापराविना बंद पडल्या आहेत. परिणामी एनआरआय येथील एका कुटुंबाला त्यांच्या मयत व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पनवेलमधील विद्युत दाहिनीचा वापर करावा लागला. या प्रकारावरून नागरिकांमध्ये जनजागृती करून दोन्ही शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

मयत व्यक्तींचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या लाकडांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे दोन विद्युत शवदाहिनी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत शवदाहिनीत मृतदेह जाळण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींच्या नातेवाइकांकडून विद्युत शवदाहिनीकडे पाठ फिरवली जात आहे. परिणामी दोन्ही विद्युत शवदाहिन्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहेत. दरम्यानच्या काळात त्या डिझेलऐवजी गॅसवर चालतील असा बदल देखील करण्यात आलेला आहे. मात्र नियमित वापर होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत आहेत. अशातच सोमवारी एनआरआय येथील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी आपल्या मृतदेहावर विद्युत दाहिनीमध्येचे अंत्यसंस्कार व्हावेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली होती. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी प्रथम करावे व नंतर तुर्भेतील विद्युत शवदाहिनीबाबत चौकशी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार बंद असल्याचे समजताच त्यांना पर्यायी पनवेलमधील विद्युत शवदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याकरिता मयत व्यक्तीच्या नातेवाइकांची ससेहोलपट झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेला निवेदन देवून दोन्ही विद्युत शवदाहिन्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचीही मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेतली जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.