कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:06 IST2016-04-22T02:06:05+5:302016-04-22T02:06:05+5:30

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.

Cleanliness of 11 wells in Karjat taluka | कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

कर्जत : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. त्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ११ विहिरींची स्वच्छता करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील श्री सदस्यांनी माती तसेच दगड आणि झाडाझुडपांनी व्यापून टाकल्याने बंद अवस्थेत असलेल्या विहिरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्णपणे बंद असलेल्या विहिरी पुन्हा जिवंत करण्याचा उपक्र म डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जलसंवर्धनअंतर्गत हाती घेतला आहे. कर्जत तालुक्यातील पोशीर आणि कळंब ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या ११ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. एकावेळी सर्व ठिकाणी श्रीसदस्य विहिरीमध्ये उतरले होते. त्यातील काही विहिरींकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्या मोडकळीस येण्याच्या स्थितीत आहेत. अशा विहिरीमधील जिवंत नैसर्गिक झऱ्यांना वाट करून देताना विहिरीचे तुटलेले दगड व्यवस्थित लावण्याचे काम श्रीसदस्यांनी के ले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलसंवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील बोरीचीवाडी, बाटलीची वाडी, मिरचुलवाडी तसेच पाटगाव याप्रमाणे पोशीर ग्रामपंचायतीमधील देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी येथील विहिरींची स्वच्छता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली. एकावेळी ५०० श्रीसदस्यांनी विहिरीचा तळ पूर्वी कुठे होता, तेथपर्यंत साचून राहिलेला गाळ तसेच माती, प्लास्टिक, बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या विहिरीमध्ये उगवलेली झाडे - झुडपे आणि सुकलेले गवत काढून टाकले. त्यासाठी तरुण श्रीसदस्य विहिरीमध्ये दोराच्या सहाय्याने उतरत होते.
साधारण ८० हजार किलो कचरा विहिरींमधून बाहेर काढण्यात आला असून त्यात सर्व प्रकारचा कचरा होता.तो सर्व कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ केलेल्या विहिरीच्या परिसरातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरून दूर टाकण्यात आला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नवीन जलसंवर्धन उपक्र मामुळे बंद असलेल्या अनेक विहिरींना नवसंजीवनी मिळणार असून स्वच्छ केलेल्या विहिरीमध्ये पाणीसाठा पिण्यासाठी वापर व्हावा हा उद्देश असल्याचे श्रीसदस्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness of 11 wells in Karjat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.