शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

जेएनपीए बंदर परिसरात रासायनिक टँकरच्या साफसफाईचा उरणच्या पर्यावरणाला धोका

By नारायण जाधव | Updated: June 18, 2024 16:57 IST

रसायनमिश्रित पाण्याने काही ठिकाणी मासे मृत्यू पावतात तर काही ठिकाणी माती प्रदूषित होते

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील जेएनपीए बंदर परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचे टँकर धुण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणाला हानीकारक असलेल्या या कृत्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांनी टँकर धुतल्यानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे कुठे मासे मरत असल्याची तर कुठे माती प्रदूषित होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जेएनपीए कंटेनर फ्रेट स्टेशनजवळील सोनारी येथील अशाच एका सेवा केंद्रात दररोज किमान १० टँकर स्वच्छ केले जातात, असे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेएनपीए परिसरात अशी अनेक टँकर सेवा केंद्रे आहेत जिथून घातक रसायनांचे टँकर धुतले जात असून त्या माध्यमातून घातक रसायने थेट खाडीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मारले जात असल्याचे ते म्हणाले.

दोषींवर कारवाई हवी

रसायनांचे टँकर धुण्याचे प्रकार नियमित अंतराने घडत असून याचा परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होतो, असे हितेश कोळी, अध्यक्ष - गव्हाण कोळीवाडा, फिशिंग सोसायटी यांनी सांगितले. यामुळे यातील दोषींवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पर्यावरणाचीही हानी

रसायनांचे टँकर अशाप्रकारे कोणतेही नियमांचे पालन न करता उघड्यावर धुण्याचे प्रकार गंभीर असून यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने पर्यावरणाची हानी होत असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे.

मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम

भरती-ओहोटी आणि कमी भरतीच्या प्रवाहासह, रसायने ओलसर जमिनीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी खाडीत आणि जिथे बरेच मासे मारतात. या बेकायदेशीर प्रक्रियेचा केवळ मासेमारी समुदायाच्या दैनंदिन व्यापारावर परिणाम होत नाही तर मातीसुद्धा प्रदूषित होत आहे, असे कुमार म्हणाले. यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी अशा घटनांकडे डोळेझाक करत आहेत. अशा घटनांमुळे पारंपरिक मच्छिमारांना मोठी किंमत मोजावी लागत असून त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन संपत चालले असल्याचे नंदकुमार पवार म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटीuran-acउरण