शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जेएनपीटीच्या सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह; खासगीकरण येत आहे अंगाशी 

By नारायण जाधव | Updated: July 17, 2022 05:39 IST

जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणा आणि तेथील एकंदरीतच सीमा शुल्क, उत्पादन  शुल्क,  स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री पनवेलनजीकच्या एका कंटेनर यार्डमधून ३६२.५९ कोटी रुपयांचे शु्द्ध हेरॉईन जप्त केले आहे. दुबईमधून आलेल्या कंटेनरमध्ये ते लपवलेले होते. धक्कादायक म्हणजे या कंटेनरचा ताबा कोणीच न घेतल्याने सहा-सात महिन्यांपासून तो माल कस्टमच्या ताब्यात होता. यामुळे हा प्रकार संबंधित कंटेनर देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या बंदरातून बाहेर स्कॅन करून बाहेर आला, त्या जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणा आणि तेथील एकंदरीतच सीमा शुल्क, उत्पादन  शुल्क,  स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

तसे पाहिले तर तस्करी आणि जेएनपीटीचे नाते खूप जुने आहे. यापूर्वीही येथे विविध वस्तू, हत्यारे आणि अमली पदार्थ तस्करीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. मात्र, तरीही संरक्षण आणि गृहखात्याने बोध घेतलेला दिसत नाही. गुरुवारी पकडलेल्या ७२ किलो ५१८ ग्रॅमच्या १६८ हेरॉईनच्या पॅकेटचा साठा महामुंबईतील अमली पदार्थांची तस्करीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे सांगणारा आहे.  प्रतिकिलो ५ कोटीप्रमाणे त्याची सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये किंमत असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग आणि उपायुक्त  सुरेश मेंगडे यांनी सांगितले आहे. 

परदेशातून नवी मुंबईमार्गे पंजाबमध्ये ड्रग्स पुरवले जाणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलला मिळाली होती. त्यामुळे या पथकाचे प्रमुख कोमलप्रीत सिंग यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबवून हेरॉईनचा हा साठा जप्त केला. त्यांनी ही माहिती दिली नसती तर हा प्रचंड साठा महामुंबईतील तरुणाईला नशेच्या खाईत ढकलण्यासाठी तस्करांनी वापरला असता.आतापर्यंत जेएनपीटी बंदरातून सर्वाधिक रक्तचंदन, काडतुसे, विदेशी दारू, वन्यप्राण्यांची कातडी, चरस, गांजा, अफू आदींची तस्करी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत शेकडो टन रक्तचंदनाची तस्करी उघड झाली आहे. 

मागे एकदा दुबईहून खजूर भरून आणल्याचे दाखवून परदेशी बनावटीच्या ११ कोटी ८८ लाख रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटही महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्या होत्या.

खासगीकरण येत आहे अंगाशी 

जेएनपीटी बंदरातील एकामागून एक सर्व बंदरांचे आता खासगीकरण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शेवटचे बंदरही खासगी कंपनीच्या ताब्यात गेले आहे. ती एकमेव देशी कंपनी आहे. उर्वरित विदेशी कंपन्या आहेत.  तेथील सुरक्षायंत्रणेवर त्यांचे नियंत्रण आपल्या ताब्यात कसे राहील, हे त्या कंपन्या पाहतात. यामुळे तस्करी  वाढत आहे. आलेले कंटेनर हे सहा-सात महिन्यांपासून सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असूनही त्यांना थांगपत्ता लागू नये, ही अतिशय गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी खेळणारी बाब आहे. याकडे केंद्रीय संरक्षण आणि गृह विभागाने गांभीर्याने पाहायला हवे.

छोटा राजनने ऑइलच्या ड्रममधून मागविली हत्यारे 

- छोटा राजनने ऑइलच्या ड्रममधून विदेशातून ३४ फॉरेन मेड रिव्हॉल्वर, तीन पिस्तुल आणि १२८३ काडतुसे मागविली होती. 

- तेव्हाच जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणेवर मोठी टीका झाली होती. यानंतर येथील कंटेनर स्कॅनरची संख्या वाढविली होती. 

- तपासणी यंत्रणा अधिक सक्षम केली होती. परंतु, ती आता फोल ठरले आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी