शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांच्या उत्पादनांना कोकण सरसच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 20:34 IST

कोकण सरसमुळे बचतगटांच्या उत्पादनासाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

नवी मुंबई- कोकण सरसमुळे बचतगटांच्या उत्पादनासाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलत आहे. असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज कोकण सरस प्रदर्शन 2019 च्या उद्घाटन प्रसंगी केले.या कार्यक्रमास एम.एस.आर.एल.एम.चे संचालक रविंद्र शिंदे, ठाणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपायुक्त (विकास) भारत शेंडगे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, सहायक आयुक्त दिपाली देशपांडे,मंजिरी व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ पाटील म्हणाले, बचत गटांमुळे महिला एकत्र येतात. महिला एकत्रित आल्या तर विचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एकूणच महिला एकत्रित आल्या की, आपले कुटुंब, गांव व समाजाचा विकास करतात. कोकणाला निसर्गाने वरदान दिलेले आहे. कोकणात पर्यटकांची गर्दी वर्षभर असते. त्यामुळे येथील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळते. त्यामुळे बचतगटांनी आपल्या उत्पादनाचे उत्पादन वर्षभर चालू ठेवले पाहिजे. आपण पर्यटकांसाठी कायमस्वरूपी भोजनव्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. तालुक्यातील बचत गटांनी एकत्र येवून काम केले पाहिजे. आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक आरोग्य व शिक्षणात केली पाहिजे. बचत गटासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते, त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. प्रशिक्षणातून तुमच्या वस्तूंचा दर्जा उंचावतो व मुल्यवृधी मिळते.

एम.एस.आर.एल.एम.चे संचालक रविंद्र शिंदे म्हणाले महिलांचा आर्थिक विकास, सबलीकरण व स्वावलंबी होण्यासाठी बचतगट हे साधन उपयोगी आहे. बचतगटांनी आपल्या मालाचा दर्जा उंचावून स्पर्धेत आपला माल बाजारात कसा विकला जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर सरस प्रदर्शने दरवर्षी भरविण्यात येतात. मुंबई मध्ये महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळते. या अभियानाच्या माध्यातून विभागातून 12 हजार 846 स्वयंसहाय्यता गट निर्माण करण्यात आले आहेत. राज्यात 3 लाख 60 हजार स्वयंसहाय्यता गट निर्माण करण्यात आले आहेत. अस्मिता बाजाराच्या माध्यमातून बचत गटांची उत्पादने ऑनलाईनही खरेदी करण्यात येतात.ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी यावेळी समयोचित भाषण केले. चिरनेर येथील महिला बचत गटाच्या प्रमुख श्रीमती शंकुतला हरिभाऊ चिरनेरकर यांनी त्यांच्या बचत गटांनी उत्पादित केलेली मातीची भांडी यावेळी मान्यवरांना भेट दिली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपायुक्त (विकास) भारत शेंडगे म्हणाले, महिला बचत गट, उत्पादक तसेच ग्राहक यांच्यामधील साखळी कमी करुन उत्पादकांचा माल ग्राहकांपर्यत पोहचविण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते. यावर्षी प्रदर्शनात सुमारे 100 महिलाबचत गटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे-24, रायगड-36, रत्नागिरी -8, पालघर-8, सिंधुदूर्ग-9 व इतर जिल्ह्यातील -15 बचत गट सहभागी झाले आहेत.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड व ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभाग व जिल्हा स्तरीय कोकण सरस विक्री व प्रदर्शन २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सिडको अर्बन हट, सी. बी. डी. बेलापूर नवी मुंबई येथे असून दि. 27 फेब्रुवारी ते दि ३ मार्च 2019 या कालावधीत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील बचत गटातील महिला व कोंकण विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.