शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बाजार समितीमध्ये बाजरीची तिप्पट आवक; घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:00 IST

हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात व उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, १८ ते २६ रुपये किलो दराने विक्री होत आहे.मुंबई, नवी मुंबईकरांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढू लागली असून प्रत्येक मोसमामध्ये आहारात बदल होऊ लागले आहेत. थंडी सुरू झाल्यापासून उष्णतावर्धक वस्तूंची मागणी वाढली आहे. यामध्ये सर्वांत जास्त मागणी बाजरीला आहे. बलवर्धक धान्य म्हणून याची ओळख आहे. कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते. यामुळेच प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये ग्राहकांकडून याला पसंती मिळत असते. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत होती. थंडी सुरू झाल्यापासून आवक तिप्पट झाली असून, बाजारभावही क्विंटलला १०० रुपयांनी वाढले आहेत.सद्य:स्थितीत १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर व इतर ठिकाणांवरून बाजरी विक्रीला येत आहे. उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, काही प्रमाणात गुजरातवरून आवक होत आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईकरांच्या घरांमध्ये व हॉटेलमध्येही बाजरीची भाकरी, थालीपीठ, बाजरीची वडी व इतर पदार्थांना पसंती मिळत आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी व परराज्यातील व्यापारी मुंबईत बाजरी विक्रीसाठी पाठवू लागले आहेत.बाजरीचे जगातील सर्वाधिक ४२ टक्के उत्पादन भारतामध्ये होत असते. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. राज्यातील नाशिक, जालना व इतर जिल्ह्यांमध्ये बाजरीची लागवड केली जाते.राज्यात सर्वाधिक विक्री मुंबईत होत आहे. मकरसंक्रांतीपर्यंत आवक चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुढील कारणांमुळे बाजरीला मागणीबाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ऊर्जास्रोत ठरत आहे. बाजरीच्या पदार्थांमुळे खूप वेळेपर्यंत भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. यामुळे हृदय सक्षम होण्यास मदत होते. यामध्ये मेग्नॅशियम व पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.बाजरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. नियमित बाजरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदतहोते.कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते.बाजरीचे पदार्थथालीपीठ, भाकरी, सूप, कटलेट्स,बाजरी खिचडी, मेथी वडी, खारवडेबाजरीची आवक व बाजारभावमार्केट आवक (क्विंटल) भाव (किलो)मुंबई ८०७ १८ ते २६जालना १०६ १५ ते २२बारामती २५९ १५ ते २२उल्हासनगर ११५ २० ते २२राज्यनिहाय बाजरीचे उत्पादन (२०१६)राज्य उत्पादन टक्केराजस्थान ३५३० ४३.६९उत्तर प्रदेश १७८० २२.३गुजरात ७९० ९.७८हरियाना ६५० ८.४मध्य प्रदेश ५९० ७.३०महाराष्ट्र ३४० ४.२१

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई