शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बायोमेट्रिक मशिनचे नेटवर्कच झाले गायब, शिधावाटप दुकानातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 02:12 IST

स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

नवी मुंबई  - स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे; परंतु नवी मुंबई शहरात वारंवार या मशिनचे नेटवर्क गायब होत असल्याने काम बंद पडत असून, नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी येणाºया या समस्या सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी काळ्या बाजारात विक्र ी करीत असून, यामुळे अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्र ारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्यात आली, यामुळे लाभार्थ्यांना धान्य घेताना बायोमेट्रिक मशिनवर अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळते. स्वस्त धान्य दुकानदारांना मशिन आणि सिमकार्ड शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबई शहरातील दुकानामध्ये असलेल्या मशिनमधील सिमकार्डचे नेटवर्क गायब होत आहे, त्यामुळे धान्य विक्रीची प्रक्रि या कोलमडत असून धान्य घेण्यासाठी रांगा लावलेल्या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या समस्येतून सुटका करण्यासाठी काही दुकानदार खासगी वायफाय इंटरनेटचा वापर करीत आहेत; परंतु ज्या दुकानामध्ये खासगी इंटरनेट सुविधा नाही, त्या ठिकाणी अशा समस्या उद्भवल्यास काम बंद पडत आहे. बायोमेट्रिक पद्धतीने मिळणाºया धान्याच्या समस्या शासनाने सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई