शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:22 IST

कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे.

कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे. गुरु वारी या इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाठीमागील सिडकोची घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीस धोका निर्माण झाला होता, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार सोसायटीने रविवारी ही धोकादायक इमारत पाडण्यास सुरु वात केली; परंतु एका तासानंतर हे पाड काम थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा हे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.कळंबोली सिडको वसाहतीतील करवली नाका जवळच असलेल्या धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरु वारी कोसळला, त्यानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने या इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार संबंधित सदनिकाधारकांनी तत्काळ घरे खाली केली. दरम्यान, अतिधोकादायक ठरलेल्या रिधिमा इमारतीवरील कारवाईवरून सोसायटीधारक आणि महापालिकेत वाद निर्माण झाला होता. इमारत पाडण्याचा खर्च कोणी करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने चार दिवस हा विषय जैसे थे राहिला होता. रिधिमा इमारतीतील सदनिकाधारकांसोबत चर्चा करून इमारत पाडण्याचा खर्च सोसायटीधारकांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे अखेर सोसायटीने महापालिकेला कळविले. त्यानुसार शनिवारी माटे असोसिएटस या कंपनीला पाडकाम देण्यात आले. यासाठी साडेसात लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. यासाठी मशिन पुण्यावरून मागवण्यात आली आहे. रविवारी मशिन कळंबोलीत आल्यानंतर सायंकाळी ५ वाजता इमारत जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरु वात करण्यात झाली; परंतु एका तासानंतर हे काम थांबवण्यात आले. उर्वरित काम सोमवारी केले जाणार आहे. या वेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू, अभियंता राहुल जाधव, मनोज चव्हाण त्यांच्यासह नगरसेवक सतीश पाटील, बबन मुकादम, भाजपचे अध्यक्ष प्रशांत रणवरे उपस्थित होते.सुरक्षिततेसाठी ६0 कुटुंबांचे स्थलांतरमोडकळीस आलेली रिधिमा इमारत कोसळण्याच्या भीतीने परिसरातील ६० कुटुंबांनी आपली राहती घरे रिकामी केली आहेत. त्यांनी आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे.रविवारी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम अर्धवट राहिल्याने ६० कुटुंब रस्त्यावर उतरले होते. आम्ही राहायचे कुठे? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला.त्यानुसार महापालिका तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत कळंबोलीतील काळभैरव हॉल येथे कुटुंबीयांच्या राहणे तसेच जेवनाची व्यवस्था करून देण्यात आली.कारवाई दरम्यान बघ्यांची गर्दीधोकादायक असलेली रिधिमा इमारत रविवारी सायंकाळी ५ वाजता पाडण्यास सुरु वात केल्यानंतर कळंबोलीतील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.इमारतीच्या चारही बाजूने गर्दी झाल्याने पोलीस तसेचमहापालिका कर्मचाऱ्यांनी ही गर्दी पांगवली, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई