शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:22 IST

कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे.

कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे. गुरु वारी या इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाठीमागील सिडकोची घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीस धोका निर्माण झाला होता, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार सोसायटीने रविवारी ही धोकादायक इमारत पाडण्यास सुरु वात केली; परंतु एका तासानंतर हे पाड काम थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा हे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.कळंबोली सिडको वसाहतीतील करवली नाका जवळच असलेल्या धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरु वारी कोसळला, त्यानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने या इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार संबंधित सदनिकाधारकांनी तत्काळ घरे खाली केली. दरम्यान, अतिधोकादायक ठरलेल्या रिधिमा इमारतीवरील कारवाईवरून सोसायटीधारक आणि महापालिकेत वाद निर्माण झाला होता. इमारत पाडण्याचा खर्च कोणी करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने चार दिवस हा विषय जैसे थे राहिला होता. रिधिमा इमारतीतील सदनिकाधारकांसोबत चर्चा करून इमारत पाडण्याचा खर्च सोसायटीधारकांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे अखेर सोसायटीने महापालिकेला कळविले. त्यानुसार शनिवारी माटे असोसिएटस या कंपनीला पाडकाम देण्यात आले. यासाठी साडेसात लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. यासाठी मशिन पुण्यावरून मागवण्यात आली आहे. रविवारी मशिन कळंबोलीत आल्यानंतर सायंकाळी ५ वाजता इमारत जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरु वात करण्यात झाली; परंतु एका तासानंतर हे काम थांबवण्यात आले. उर्वरित काम सोमवारी केले जाणार आहे. या वेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू, अभियंता राहुल जाधव, मनोज चव्हाण त्यांच्यासह नगरसेवक सतीश पाटील, बबन मुकादम, भाजपचे अध्यक्ष प्रशांत रणवरे उपस्थित होते.सुरक्षिततेसाठी ६0 कुटुंबांचे स्थलांतरमोडकळीस आलेली रिधिमा इमारत कोसळण्याच्या भीतीने परिसरातील ६० कुटुंबांनी आपली राहती घरे रिकामी केली आहेत. त्यांनी आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे.रविवारी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम अर्धवट राहिल्याने ६० कुटुंब रस्त्यावर उतरले होते. आम्ही राहायचे कुठे? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला.त्यानुसार महापालिका तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत कळंबोलीतील काळभैरव हॉल येथे कुटुंबीयांच्या राहणे तसेच जेवनाची व्यवस्था करून देण्यात आली.कारवाई दरम्यान बघ्यांची गर्दीधोकादायक असलेली रिधिमा इमारत रविवारी सायंकाळी ५ वाजता पाडण्यास सुरु वात केल्यानंतर कळंबोलीतील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.इमारतीच्या चारही बाजूने गर्दी झाल्याने पोलीस तसेचमहापालिका कर्मचाऱ्यांनी ही गर्दी पांगवली, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई