शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्याचा प्रयत्न;महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:39 PM

''माझी वसुंधरा'' अभियान; महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक

नवी मुंबई : पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे ''माझी वसुंधरा'' अभियान राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराची पर्यावरणशील शहर म्हणून ओळख करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 

पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांशी निगडित जीवनशैलीचा स्विकार करून शाश्वत व निसर्गपूरक जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी ''माझी वसुंधरा'' हे विशेष अभियान राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राज्य स्तरावर राबविण्यात येत आहे. पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.

२ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात नवी मुंबई महानगरपालिका सहभागी असून, महापालिका आयुक्त बांगर यांनी अभियानाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा व राबविण्याच्या उपक्रमांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. 

यामध्ये पृथ्वी तत्त्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच वायू तत्त्वाकरिता प्रदूषण कमी करून हवा गुणवत्तेत सुधारणा करणेविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई