शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण : खटला कमजोर करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:57 AM

पतीसह भावाचा आरोप

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात दुसरी चार्जशीट दाखल झाली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. खटल्याचा निकाल लागेपर्यंत तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांची बदली करू नये, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. नवी मुंबई पोलीस हे प्रकरण दाबण्याचा आजही प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे यांचा भाचा यात अडकल्याने राजकीय दबावही आणला जात असल्याचा आरोप अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे यांनी केला. पोलीस आमच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणत आहेत. पत्रकार परिषदेतही साध्या वेशातील तीन ते चार पोलीस तैनात केले जात असल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला. पुरावे नष्ट करून खटला कमजोर करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्याला विरोध केल्याने पोलीस, राजकारण्यांकडून आमच्या जिवाला धोका आहे. आमच्या कुटुंबाचे बरे-वाईट झाल्यास याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा अश्विनी यांचे वृद्ध वडील जयकुमार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण