शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

एपीएमसीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान, सात हजार कोटींचा व्यापार धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:11 IST

मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - मुंबई एपीएमसीमध्ये प्रत्येक वर्षी जवळपास ७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असून, एक लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे, परंतु केंद्र शासनाच्या नवीन अध्यादेशानंतर संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी होऊ लागली असून, मार्केटचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान शासन व प्रशासनासमोर उभे राहिले आहे. योग्य व ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर मॅफ्को व कापड मीलप्रमाणे बाजारसमितीचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक संकटात बाजारसमितीमधील कामगारांसह व्यापारीही मदतीचा हात पुढे करत असतात. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतरही मार्केट सुरळीत करण्यात बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. दीड कोटी नागरिकांना वेळेत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त नागरिक मार्केटमध्ये राबत असून, सद्यस्थितीमध्ये बाजारसमितीचेच अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२००८ पर्यंत मुंबईमधील कृषी व्यापारावर बाजारसमितीचे संपूर्ण नियंत्रण होते, परंतु मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन व भाजीपाला, साखर, फळे व इतर वस्तुंची नियमनमुक्ती व आता केंद्र शासनाचा शेतकऱ्यांचे उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार अध्यादेश २०२० यामुळे मार्केटचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पणन संचालकांनी १० आॅगस्टला राज्यातील सर्व बाजारसमित्यांना दिल्या आहेत. यामुळे मुंबई एपीएमसीमध्येही खळबळ उडाली आहे. बाजारसमितीमधील धान्य व मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद करून संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी केली आहे. बाजारसमितीचा कर रद्द करण्याची मागणी केली आहे. एपीएमसीबाहेर व्यापार करणाºयांना कोणताच कर नाही व मार्केटमध्ये व्यापार करणाºयांनी सर्व नियमांची अंमलबजावणी करायची, अशा प्रकारे दुहेरी नियमावली नसावी. सर्वांना समान न्याय देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे बाजारसमितीचे ठाणे मार्केट, ऊस, केळी, तूप, शहाळे यावरील नियमन रद्द होऊन उत्पन्न बंद होणार आहे. बाजारसमितीला सर्वाधिक उत्पन्न मसाला व धान्य मार्केटमधून होत असते. या दोन्ही मार्केटमधील नियमन हटविले, तर मार्केटचे उत्पन्नाचे मार्गच बंद होतील. बाजारसमितीमधील कर्मचाºयांचे पगार व पाच मार्केटची देखभाल दुरुस्ती करणेही शक्य होणार नाही. यामुळे शासनाने बाजारसमितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.पगार देणेही अशक्यमुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीला प्रत्येक महिन्याला ५ ते ७ कोटी रुपयांचा महसूल बाजार फीच्या माध्यमातून होत होता. यामधील जवळपास साठ टक्के महसूल फक्त धान्य व मसाला मार्केटमधून होत होता. सद्यस्थितीमध्ये कोरोनामुळे महसूल घटला आहे. धान्य व मसाला मार्केटमधील नियमन हटविले, तर बाजारसमितीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. एपीएमसीच्या अस्थापनेवर जवळपास ४६० अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. सुरक्षारक्षक व साफसफाई कामगार पकडून कर्मचाºयांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे. एपीएमसीचे उत्पन्न घटले, तर कर्मचाºयांचे वेतन देणेही अशक्य होणार आहे.माथाडी कामगारांना सर्वाधिक फटकाकेंद्र शासनाच्य्ाां नवीन धोरणाची अंमलबजावणी केली, तर त्याचा थेट फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. २००८ पासून मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन, भाजीपाला, साखर, फळांची नियमनमुक्ती, यामुळे बाजारसमितीमधील आवक कमी झाली असून, माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी केली, तर मार्केटमधील व्यापार जवळपास ठप्प होऊन कामगारांवर गिरणी कामगारांप्रमाणे बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.एपीएमसीमधील आवक थांबेलशासनाने एपीएमसीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरतेच मर्यादित ठेवले, तर आवक ंकमी होण्याची शक्यता आहे. व्यापारी मार्केटऐवजी एमआयडीसीमधील गोदाम व कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवण्याची शक्यता असून, तेथूनच थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याची शक्यता आहे. एपीएमसीमधील आवक कमी झाली, तर माथाडी कामगार व वाहतूकदारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई