शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एपीएमसी पुन्हा बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 04:08 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. येथे आश्रय घेतलेल्या दोघांनी महावितरणच्या गोडाऊनमधून केबल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सद्यस्थितीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना मार्केटमध्ये मुक्काम करत असून एपीएमसीला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.वाशी सेक्टर १९ मधील वीज मंडळाच्या गोडाऊनमध्ये ३१ मे रोजी दोघांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. नटबोल्ट व एक्साब्लेडच्या सहाय्याने बंद ट्रान्सफॉर्मरमधील १० किलो कॉपर केबल काढली. केबल चोरी करून नेत असताना पोलिसांनी ईसराईल सत्तार शेख या आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता तो मूळचा झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील रहिवासी असून बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. पळून गेलेला आरोपी शिरअली खान हाही बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये काम करत आहे. आरोपी एपीएमसीमध्ये कोणाकडे काम करतात याविषयी माहिती घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु या कामगारांची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. मार्केटमध्ये पाहणी केली असता दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार मुक्काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे गोडाऊन बंद झाल्यानंतर कोणीही मार्केटमध्ये थांबू नये. येथे काम करणाऱ्या प्रत्येकाची नोंद बाजार समितीकडे असणे आवश्यक आहे. परंतु परप्रांतीय मजुरांची नोंद कोणाकडेच उपलब्ध नाही. या कामगारांच्या आडून गुन्हेगारही याठिकाणी आश्रय घेऊ लागले आहेत.यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी मार्केटमध्ये सापडले आहेत. दहा वर्षांमध्ये २०० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. खून, दरोडे व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक झाली आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये गांजा विक्री केली जाते. आतापर्यंत या ठिकाणावरून हरिभाऊ विधाते, दत्ता विधाते, राजू घासवाला,पप्या, तुंडा यांना गांजा विक्रीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. यापूर्वी अतिरेकी कारवाईशी संबंधित असलेल्यांनाही या ठिकाणावरून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी नकली नोटा चलनात आणणारे रॅकेटही या परिसरामध्ये कार्यरत होते.अतिरेकीही सापडले होते१६ जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी मस्जिदबंदरमधील रिलॅक्स गेस्ट हाउसमधून हिजबुल मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी फारूख नायकू व मोहम्मद तालुकदार यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २७ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. यामधील नायकू याने एक वर्ष एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये व्यापार केल्याचे स्पष्ट झाले होते. नायकू अनेक वेळा पाकिस्तानमध्ये जावून हिजबुलच्या कमांडरलाही भेटल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समिती प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.पोलिसांच्यासूचनांकडे दुर्लक्षएपीएमसी पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बाजार समितीला यापूर्वीही अनेक वेळा नोटीस दिली आहे. येथे काम करणाºया व मुक्काम करणाºयांची नोंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु प्रशासन या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. मार्केटमध्ये कॅमेरेही बसविले जात नाहीत. पोलीस नियमित गस्त घालत असून कोणीही संशयित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.अमली पदार्थांचा व्यापारबाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये विनापरवाना वास्तव्य करणाºया अनेक कामगारांना अमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यांना गांजा, गुटखासह इतर अमली पदार्थ पुरविणारी साखळीही या परिसरात कार्यरत आहे. यापूर्वी चार गांजा माफियांना येथून पोलिसांनी अटक केली आहे.प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर न्यायालयाचे निर्बंध आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. मार्केटमधील सुरक्षेच्या संदर्भात योग्य काळजी घेण्याच्या सूचना सचिवांना देण्यात येतील.- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समिती

टॅग्स :Crimeगुन्हा