शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एपीएमसीला लाभले ४३ वर्षांत नऊ सभापती; चार दशकांमध्ये १४ वेळा प्रशासकाची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 04:38 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. ए

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. सर्वात श्रीमंत बाजारपेठेच्या ४३ वर्षांच्या वाटचालीमध्ये आतापर्यंत नऊ जणांना सभापती होण्याची संधी मिळाली असून, त्यामध्ये दोन तत्कालीन आमदार व दोन माजी आमदारांचाही समावेश आहे. आतापर्यंत तब्बल १४ वेळा संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार या संस्थेमुळे प्राप्त झाला आहे. वर्षाला दहा हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असल्यामुळे या संस्थेच्या संचालकपदावर वर्णी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस निर्माण झालेली असते. १५ जानेवारी १९७७ मध्ये शासनाने बाजार समितीची स्थापना केली. मुंबईमधील कृषी व्यापारावर नियंत्रण ठेवणे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा व सुरक्षितता प्राप्त व्हावी, या उद्देशाने बाजार समिती सुरू करण्यात आली. दादर व इतर ठिकाणी विखुरलेल्या कृषी व्यापारामुळे मुुंबईमधीलवाहतूककोंडी वाढू लागल्यामुळे या सर्व बाजारपेठा नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या. ७२ हेक्टर जमिनीवर धान्य, मसाला, भाजी, फळे, कांदा-बटाटा यासाठी पाच स्वतंत्र मार्केट उभारण्यात आली. मुंबईमधील कृषी मालाच्या व्यापारावर पूर्णपणे बाजार समितीचे नियंत्रण असल्यामुळे संस्थेवरील संचालकांना महामंडळाच्या अध्यक्षांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. स्थापनेपासून संस्था काँगे्रसच्या व नंतर राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात राहिली आहे. ४३ पैकी २९ वर्षे संचालक मंडळाने कामकाज पाहिले असून, उर्वरित १४ वर्षांमध्ये १४ प्रशासकांची संस्थेवर नियुक्ती करण्यात आली आहे.बाजार समितीची प्रशासकीय व संचालक मंडळही अनेक वेळा राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. येथील व्यापारी व कामगारांनी बंद केला की, मुंबईकरांचा अन्नधान्याचा पुरवठाही बंद होतो. यामुळे शासनाचेही या संस्थेवर व येथील व्यवहारावर विशेष लक्ष असते. पा. शी. देशमुख, कि. बा. म्हस्के व व्ही. जी. शिवदारे या तिघांनी सुरुवातीची सात वर्षे सभापती म्हणून काम पाहिले. पुढील चार वर्षे संचालक मंडळाची नियुक्ती झाली नसल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. मार्च १९८८ मध्ये जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची सभापतिपदावर नियुक्ती झाली. जवळपास सात वर्षे त्यांनी हे पद भूषविले. त्यांच्या कार्यकाळामध्ये संस्थेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरतीही करण्यात आले.सभापती नसतानाही अनेक वर्ष बोर्डीकर यांची बाजार समितीवर पकड राहिली होती. त्यांना मानणारा मोठा कर्मचारी व अधिकारीवर्ग सद्यस्थितीमध्येही मार्केटमध्ये आहे. त्यांच्यानंतर पुण्यामधील आमदार कुमार गोसावी डिसेंबर २००१ ते फेब्रुवारी २००५ दरम्यान सभापती राहिले आहेत. त्यांच्यानंतर द्वारकाप्रसाद काकाणी, दिलीप काळे व बाळासाहेब सोळसकर यांनी सभापती म्हणून कामकाज पाहिले आहे.संचालक मंडळावरही वजनदार नेतेमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावरही राज्यातील अनेक वजनदार नेत्यांची वर्णी लागली आहे. माजी आमदार कि़ बा. म्हस्के यांनी १९७७ मध्ये सभापतिपद भूषविले होते. रामप्रसाद बोर्डीकर, कुमार गोसावी या तत्कालीन आमदारांनीही सभापतिपद भूषविले आहे. माथाडी कामगारनेते शशिकांत शिंदे व नाशिकचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनीही बाजार समितीचे संचालकपद भूषविले असून, अनेक राजकीय पदाधिकाºयांमध्ये मुंबई बाजार समितीच्या संचालकमंडळावर जाण्याची इच्छा असते. बाजार समितीवर काही दिवस सभापती राहिलेले हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हेही पुढे नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.बाजार समितीचे कामकाज वादग्रस्तमुंबई बाजार समितीचे कामकाज अनेक वेळा वादग्रस्तही ठरले आहे. येथील वाहनांचा वापर पणन मंत्र्यांकडून होत असल्याचे प्रकरणही राज्यभर गाजले होते. येथील एफएसआय घोटाळ्याची चर्चाही राज्यभर झाली आहे. बँकेत ठेवलेल्या ठेवींचा अपहार व इतर कामकाजही अनेक वेळा वादग्रस्त ठरले आहे.अधिकार केले कमीमुंबईमधील कृषी व्यापार पूर्वी पूर्णपणे बाजार समितीच्या नियंत्रणामध्ये होता; परंतु नंतर मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन व अत्यावश्यक वस्तूंना बाजार समितीमधून वगळल्यामुळे सद्यस्थितीमध्ये बाजार समितीचे अधिकारही मर्यादित राहिले असून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीमध्ये संस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापतीनाव                                       कार्यकाळपा. शि. देशमुख जानेवारी १९७७ ते फेब्रुवारी १९७७कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी १९७७ ते जानेवारी १९८१व्ही. जी. शिवदारे जानेवारी १९८१ ते फेब्रुवारी १९८४व्ही. के. बोरावके मार्च १९८६ ते मार्च १९८८रामप्रसाद बोर्डीकर मार्च १९८८ ते एप्रिल १९९५कुमार गोसावी डिसेंबर २००१ ते फेब्रुवारी २००५द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी २००५ ते जानेवारी २००८दिलीप काळे डिसेंबर २००८ ते आॅगस्ट २०१०बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर २०१० ते डिसेंबर २०१४

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई