शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:31 IST

मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

नवी मुंबई : मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी तीनपेक्षा अधिक वेळा कारवाया होऊनही पुन्हा तिथे झोपड्या थाटल्याचे चित्र अनेक नोडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला अनधिकृत झोपड्यांचा विळखा बसू लागला आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता अभियानाला बाधा निर्माण होत आहे, तर झोपड्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थारा मिळत असल्याने त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. परिणामी शहरातील अनधिकृत झोपड्या मोठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत. अशा झोपड्या वेळीच हटवण्याची मागणी यापूर्वी अनेकदा पोलिसांनी देखील केलेली आहे. त्यानुसार अनेकदा अशा झोपड्यांवर कारवाई देखील केली जाते. मात्र, दुस-या दिवशीच पुन्हा त्याठिकाणी झोपड्या उभ्या राहत असल्याचेही पाहायला मिळते. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये असे अनेक भूखंड आहेत, ज्यावरील झोपड्यांवर सिडको अथवा पालिकेने अनेकदा कारवाया केल्या आहेत. यानंतरही झोपड्या कायमस्वरूपी हटत नसल्याने दोन्ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगत एका भूखंडावर कारवाईवेळी पोलिसांवर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. त्यामध्ये जखमी झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून या झोपड्या हटवण्यात आल्या होत्या; परंतु कारवाईच्या काही दिवसानंतर पुन्हा त्याठिकाणी दुपटीने झोपड्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पदपथांवर देखील ताबा मिळवला असून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले आहे. त्याचप्रमाणे एपीएमसी येथील माथाडी भवन चौकालगतच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शेजारील भूखंडावर देखील वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. त्याठिकाणी झोपड्यांमध्ये गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. त्यावर एपीएमसी पोलिसांनी अनेकदा कारवाई देखील केलेली आहे.मात्र, काही दिवसांनी पुन्हा झोपड्यांच्या आडून त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. या झोपडपट्टीवर मागील काही वर्षात सात ते आठ वेळा कारवाई झालेली आहे. यानंतरही सदर झोपडपट्टी हटण्याऐवजी तिथल्या झोपड्यांमध्ये वाढच होताना दिसून येत आहे. परिणामी रात्री अपरात्री सदर मार्गाने पायी चालत जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत झोपड्यांवर कारवाईनंतर त्याठिकाणी कुंपण घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई