शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अग्नितांडव... नवी मुंबईत भीषण आग, ६ कारखाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 01:45 IST

खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले.

नवी मुंबई : खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले. दुर्घटनेत तीनजण जखमी झाले असून, छतावर तिघे अडकून दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासला. त्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला. अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आणि महापालिका, सिडकोच्या १५ ते २० पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही.  

आग लागल्यानंतर झालेल्या छोट्या-मोठ्या स्फोटांमुळे लगतच्या इतरही कारखान्यांना धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील वेस्ट कॉस्ट पॉलिकेम या कारखान्यास आग लागली. काही क्षणातच आग शेजारच्या नागनिवेश, हिंद या कारखान्यांसह डेरी व इतर तीन कारखान्यांमध्ये पसरली. नागनिवेश कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेला बदामाचा साठा व वेस्ट कॉस्टमधील रबराने पेट घेतल्याने आगीचा भडका उडत होता. रबराच्या कारखान्यातून धुराचे मोठमोठे लोट निघत होते. या दरम्यान वेस्ट कॉस्ट कंपनीच्या छतावर तीन कामगार अडकल्याचे नजरेस पडले. सर्वत्र धूर पसरल्याने नंतर त्यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. दुर्घटनेत १५ ते २० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

आग लागल्यानंतर तीन जखमी कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. आग शेजारच्या कारखान्यांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीला महापालिका व सिडकोचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले होते. 

वेळेवर पाणी मिळाले नाही, जबाबदार कोण?आग विझविण्याचे काम सुरू असताना पाण्याची गरज भासत होती. परंतु, एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासत होता. अखेर घटनास्थळी उपस्थित माजी महापौर यांनी पालिका आयुक्तांशी संवाद साधून इतर ठिकाणी टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी घटनास्थळी मागवून घेतले. एखाद्या मोठ्या आगीच्या दुर्घटनेत ती विझवण्यासाठी जाणवणाऱ्या उणिवा नवी मुंबईसारख्या प्रगत महापालिका आणि एमआयडीसीत शुक्रवारी आढळून आल्या.

एनडीआरएफची मदत मिळविण्याचा प्रयत्नकारखान्याच्या छतावर तीन कामगार अडकल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी एनडीआरएफला संपर्क साधून मदत मिळू शकते का, याबाबत चौकशी केली. परंतु, आगीची घटना असल्याने हेलिकॉप्टर अथवा इतर प्रकारे मदत पुरविणे कठीण असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

सुरुवातीला फक्त करावा लागला पाण्याचा माराफोम घेऊन वाहने लवकरच यावीत, यासाठी ओएनजीसीपासून दुर्घटनास्थळापर्यंत पोलिसांनी खास ग्रीन कॉरिडॉर केला होता. आग लागलेल्या एका कारखान्यात बदामाचा साठा, दुसऱ्या कारखान्यात रबरचे साहित्य असल्याने पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. परंतु, सुरुवातीला फोमचा पुरेसा पुरवठा न होऊ शकल्याने केवळ पाण्याचा मारा करूनच आग विझविण्याची कसरत अग्निशमन दलाला करावी लागली.

जखमींवर रुग्णालयात उपचारप्रिया पटेल (३०), पद्मनी तलाठे (३६) या दोन महिलांसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती ठिक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFire Brigadeअग्निशमन दल