शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अग्नितांडव... नवी मुंबईत भीषण आग, ६ कारखाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 01:45 IST

खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले.

नवी मुंबई : खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले. दुर्घटनेत तीनजण जखमी झाले असून, छतावर तिघे अडकून दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासला. त्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला. अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आणि महापालिका, सिडकोच्या १५ ते २० पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही.  

आग लागल्यानंतर झालेल्या छोट्या-मोठ्या स्फोटांमुळे लगतच्या इतरही कारखान्यांना धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील वेस्ट कॉस्ट पॉलिकेम या कारखान्यास आग लागली. काही क्षणातच आग शेजारच्या नागनिवेश, हिंद या कारखान्यांसह डेरी व इतर तीन कारखान्यांमध्ये पसरली. नागनिवेश कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेला बदामाचा साठा व वेस्ट कॉस्टमधील रबराने पेट घेतल्याने आगीचा भडका उडत होता. रबराच्या कारखान्यातून धुराचे मोठमोठे लोट निघत होते. या दरम्यान वेस्ट कॉस्ट कंपनीच्या छतावर तीन कामगार अडकल्याचे नजरेस पडले. सर्वत्र धूर पसरल्याने नंतर त्यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. दुर्घटनेत १५ ते २० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

आग लागल्यानंतर तीन जखमी कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. आग शेजारच्या कारखान्यांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीला महापालिका व सिडकोचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले होते. 

वेळेवर पाणी मिळाले नाही, जबाबदार कोण?आग विझविण्याचे काम सुरू असताना पाण्याची गरज भासत होती. परंतु, एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासत होता. अखेर घटनास्थळी उपस्थित माजी महापौर यांनी पालिका आयुक्तांशी संवाद साधून इतर ठिकाणी टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी घटनास्थळी मागवून घेतले. एखाद्या मोठ्या आगीच्या दुर्घटनेत ती विझवण्यासाठी जाणवणाऱ्या उणिवा नवी मुंबईसारख्या प्रगत महापालिका आणि एमआयडीसीत शुक्रवारी आढळून आल्या.

एनडीआरएफची मदत मिळविण्याचा प्रयत्नकारखान्याच्या छतावर तीन कामगार अडकल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी एनडीआरएफला संपर्क साधून मदत मिळू शकते का, याबाबत चौकशी केली. परंतु, आगीची घटना असल्याने हेलिकॉप्टर अथवा इतर प्रकारे मदत पुरविणे कठीण असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

सुरुवातीला फक्त करावा लागला पाण्याचा माराफोम घेऊन वाहने लवकरच यावीत, यासाठी ओएनजीसीपासून दुर्घटनास्थळापर्यंत पोलिसांनी खास ग्रीन कॉरिडॉर केला होता. आग लागलेल्या एका कारखान्यात बदामाचा साठा, दुसऱ्या कारखान्यात रबरचे साहित्य असल्याने पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. परंतु, सुरुवातीला फोमचा पुरेसा पुरवठा न होऊ शकल्याने केवळ पाण्याचा मारा करूनच आग विझविण्याची कसरत अग्निशमन दलाला करावी लागली.

जखमींवर रुग्णालयात उपचारप्रिया पटेल (३०), पद्मनी तलाठे (३६) या दोन महिलांसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती ठिक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFire Brigadeअग्निशमन दल