शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

By नारायण जाधव | Updated: July 12, 2023 18:48 IST

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. तर ८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडांचा बळी ‘एचपीसीएल’ अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन घेणार आहे. ‘एचपीसीएल’ त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलच्या विकासासाठी ४५० झाडांची कत्तल करणार असून, ५२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. तर नवी मुंबई महापालिका तिच्या बहुप्रतिक्षित पाच बीच मार्गावरील सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांचा बळी घेणार आहे. याशिवाय ३२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.

याबाबत एमआयडीसीने ‘एचपीसीएल’चा तर नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सातव्या बैठकीत मंजुरी दिली आहे. वृक्षकत्तलीस मंजुरी मिळाल्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात भरदार वृक्षांचा बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भरपाईच्या वृक्षलागवडीसाठी जागा नाहीएचपीसीएल त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलसाठी ज्या झाडांचा बळी घेणार आहे, त्यांचे सरासरी आयुष्यमान ५०६४ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढीच वृक्षलागवड त्यांना करावी लागणार आहे. यात ज्या जातीच्या वृक्षांचा बळी जाणार आहे, तीच लागवड एचपीसीएलला करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली १.३ हेक्टर जागा एचपीसीएलने सुचविलेली आहे, ती पुरेशी नाही, असे निरीक्षण राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने नोंदविले आहे. यामुळे त्यांनी पुरेशी जागा शोधून तिचे ताबा पत्र राज्य वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करायचे आहे.

पाम बीच भुयारी मार्गात १९२ झाडांचा बळीपाम बीच मार्गावर सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ नवी मुंबई महापालिका जो आरसीसी बॉक्स टाइप हा भुयारी मार्ग ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधणार आहे. त्यासाठी ९२ झाडांची कत्तल करावी लागणार असून, ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या झाडांचे सरासरी आयुष्यमान ६०६३ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची लागवड करण्याचे बंधन महापालिकेस वृक्ष प्राधिकरण समितीने घातले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्पमहाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे वृक्ष कत्तलीचे एक हत्यारच बनली आहे. ही समिती फक्त वृक्षतोडीसच परवानगी देते. कधीही पर्याय सुचवित आहे. शिवाय विविध वृक्षतोडीसाठी जे प्रस्ताव पाठवितात, ते कितपत योग्य आहेत, तेवढी वृक्षतोड आवश्यक आहे की नाही, बरे जेवढ्या वृक्षतोडीस परवानगी दिली आहे, तितकीच होते की जास्त होते, हे पाहायलाही त्यांचे सदस्य कधी स्थळ पाहणी करीत नाहीत. यामुळे खरे सांगायचे झाल्यास वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प झाली आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई