शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
3
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
4
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
7
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
8
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
9
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
10
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
11
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
12
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
13
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
14
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
15
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
16
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
17
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
18
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
19
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
20
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

By नारायण जाधव | Updated: July 12, 2023 18:48 IST

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. तर ८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडांचा बळी ‘एचपीसीएल’ अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन घेणार आहे. ‘एचपीसीएल’ त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलच्या विकासासाठी ४५० झाडांची कत्तल करणार असून, ५२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. तर नवी मुंबई महापालिका तिच्या बहुप्रतिक्षित पाच बीच मार्गावरील सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांचा बळी घेणार आहे. याशिवाय ३२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.

याबाबत एमआयडीसीने ‘एचपीसीएल’चा तर नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सातव्या बैठकीत मंजुरी दिली आहे. वृक्षकत्तलीस मंजुरी मिळाल्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात भरदार वृक्षांचा बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भरपाईच्या वृक्षलागवडीसाठी जागा नाहीएचपीसीएल त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलसाठी ज्या झाडांचा बळी घेणार आहे, त्यांचे सरासरी आयुष्यमान ५०६४ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढीच वृक्षलागवड त्यांना करावी लागणार आहे. यात ज्या जातीच्या वृक्षांचा बळी जाणार आहे, तीच लागवड एचपीसीएलला करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली १.३ हेक्टर जागा एचपीसीएलने सुचविलेली आहे, ती पुरेशी नाही, असे निरीक्षण राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने नोंदविले आहे. यामुळे त्यांनी पुरेशी जागा शोधून तिचे ताबा पत्र राज्य वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करायचे आहे.

पाम बीच भुयारी मार्गात १९२ झाडांचा बळीपाम बीच मार्गावर सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ नवी मुंबई महापालिका जो आरसीसी बॉक्स टाइप हा भुयारी मार्ग ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधणार आहे. त्यासाठी ९२ झाडांची कत्तल करावी लागणार असून, ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या झाडांचे सरासरी आयुष्यमान ६०६३ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची लागवड करण्याचे बंधन महापालिकेस वृक्ष प्राधिकरण समितीने घातले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्पमहाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे वृक्ष कत्तलीचे एक हत्यारच बनली आहे. ही समिती फक्त वृक्षतोडीसच परवानगी देते. कधीही पर्याय सुचवित आहे. शिवाय विविध वृक्षतोडीसाठी जे प्रस्ताव पाठवितात, ते कितपत योग्य आहेत, तेवढी वृक्षतोड आवश्यक आहे की नाही, बरे जेवढ्या वृक्षतोडीस परवानगी दिली आहे, तितकीच होते की जास्त होते, हे पाहायलाही त्यांचे सदस्य कधी स्थळ पाहणी करीत नाहीत. यामुळे खरे सांगायचे झाल्यास वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प झाली आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई