शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

By नारायण जाधव | Updated: July 12, 2023 18:48 IST

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. तर ८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडांचा बळी ‘एचपीसीएल’ अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन घेणार आहे. ‘एचपीसीएल’ त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलच्या विकासासाठी ४५० झाडांची कत्तल करणार असून, ५२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. तर नवी मुंबई महापालिका तिच्या बहुप्रतिक्षित पाच बीच मार्गावरील सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांचा बळी घेणार आहे. याशिवाय ३२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.

याबाबत एमआयडीसीने ‘एचपीसीएल’चा तर नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सातव्या बैठकीत मंजुरी दिली आहे. वृक्षकत्तलीस मंजुरी मिळाल्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात भरदार वृक्षांचा बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भरपाईच्या वृक्षलागवडीसाठी जागा नाहीएचपीसीएल त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलसाठी ज्या झाडांचा बळी घेणार आहे, त्यांचे सरासरी आयुष्यमान ५०६४ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढीच वृक्षलागवड त्यांना करावी लागणार आहे. यात ज्या जातीच्या वृक्षांचा बळी जाणार आहे, तीच लागवड एचपीसीएलला करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली १.३ हेक्टर जागा एचपीसीएलने सुचविलेली आहे, ती पुरेशी नाही, असे निरीक्षण राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने नोंदविले आहे. यामुळे त्यांनी पुरेशी जागा शोधून तिचे ताबा पत्र राज्य वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करायचे आहे.

पाम बीच भुयारी मार्गात १९२ झाडांचा बळीपाम बीच मार्गावर सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ नवी मुंबई महापालिका जो आरसीसी बॉक्स टाइप हा भुयारी मार्ग ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधणार आहे. त्यासाठी ९२ झाडांची कत्तल करावी लागणार असून, ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या झाडांचे सरासरी आयुष्यमान ६०६३ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची लागवड करण्याचे बंधन महापालिकेस वृक्ष प्राधिकरण समितीने घातले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्पमहाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे वृक्ष कत्तलीचे एक हत्यारच बनली आहे. ही समिती फक्त वृक्षतोडीसच परवानगी देते. कधीही पर्याय सुचवित आहे. शिवाय विविध वृक्षतोडीसाठी जे प्रस्ताव पाठवितात, ते कितपत योग्य आहेत, तेवढी वृक्षतोड आवश्यक आहे की नाही, बरे जेवढ्या वृक्षतोडीस परवानगी दिली आहे, तितकीच होते की जास्त होते, हे पाहायलाही त्यांचे सदस्य कधी स्थळ पाहणी करीत नाहीत. यामुळे खरे सांगायचे झाल्यास वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प झाली आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई