शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शहरात १० दिवसांत ५८ वृक्ष कोसळले; झाडांखाली वाहने उभी न करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:57 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाऊस पडलेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल ५८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसामध्येही गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी व शक्यतो झाडांखाली वाहने उभी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून वृक्ष कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरामध्ये महानगरपालिकेने रोडच्या दोन्ही बाजूंनी व दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड केली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वृक्ष लावले आहेत. यामधील अनेक वृक्षांना तीस ते चाळीस वर्षे झाली आहेत. वृक्ष लागवड करताना आंबा, जांभूळ, वड, पिंपळ अशा देशी झाडांना पसंती दिली जात नाही. कमी वेळेत येणारे व फांद्यांचा जास्त विस्तार न होणाऱ्या विदेशी झाडांची लागवड करण्यास पसंती देण्यात आली. हे वृक्ष पावसाळ्यात तग धरून रहात नाहीत. पाऊस व वारा सुरू झाला की वृक्ष कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. नवी मुंबईमध्ये १३ जूनला पहिल्यांदा पाऊस पडला होता. २४ तासांमध्ये फक्त ४.७० मिमी एवढाच पाऊस पडला असला तरी त्या दिवशी ९ वृक्ष कोसळले. यामधील ४ नेरूळमधील होते. तेव्हापासून रोज वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहेत. २८ जून व १ जुलैला प्रत्येकी ११ ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.नेरूळ व वाशीमध्ये वृक्ष कोसळल्यामुळे दुचाकी व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. या घटना प्रतिदिन घडत असल्यामुळे पावसाळा संपेपर्यंत अशा अपघातामुळे नागरिक गंभीर जखमी होण्याची किंवा जीव गमवावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारामधील वृक्षांच्या धोकादायक ठरतील अशा फांद्या तोडल्या आहेत. रोडवरील फांद्या महापालिकेने तोडल्या आहेत. या कचºयाची समस्या गंभीर झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रोज ५० ते ८० टन वृक्षांच्या फांद्यांचा कचरा उचलावा लागत होता. घनकचरा व्यवस्थापनाला जादा वाहने या कामासाठी उपलब्ध करून द्यावी लागली आहेत. धोकादायक फांद्या छाटल्यानंतरही वृक्ष कोसळण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. यामुळे महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रोडवरच वाहने उभी केली जातात. वृक्ष कोसळल्यामुळे या वाहनांचेही नुकसान होवू लागले आहे. यामुळे नागरिकांनी त्यांची वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावी व पादचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.पनवेलमधील स्थितीही गंभीरमुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटना पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्येही वाढल्या आहेत. खारघर, कळंबोली, व पनवेल परिसरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. या घटनांमध्ये पार्र्किं ग केलेल्या काही गाड्यांचे नुकासान झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व वृक्षांखाली वाहने उभी करू नयेत, असे आवाहनही केले आहे. पावसाळा पूर्ण होईपर्यंत या घटना अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विजेचा धक्का बसण्याची भीतीपावसाळा सुरू झाल्यापासून आठ ठिकाणी आग व शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी बॉक्स धोकादायक स्थितीमध्ये आहेत. काही ठिकाणी झाकणे बसविलेली नाहीत. काही ठिकाणी बांबूचा टेकू लावण्यात आला आहे. नागरिकांनी विजेचा पोल, किंवा डीपी बॉक्सला हात लावू नये. विशेषत: लहान मुलांना खेळताना डीपी बॉक्स व विजेच्या खांबाला हात लावू देवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई