शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

वेतनवाढीसाठी ४०० कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:28 AM

आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले.

उरण : चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, कामगारांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बाहेरून कामगार आणून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. आंदोलनादरम्यान व्यवस्थापनाकडून कामगारांनाही मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.आशिया खंडात एकूण १८ प्रोजेक्ट असलेल्या साई येथील आर्शिया गोदाम उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावात कंपनीसाठी दिल्या.कंपनीत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेले कामगार लेबर, सुपरवायझर, हाउसकिपिंग, सिक्युरिटी, सर्व्हेअर, आरटी आॅपरेटर, बीओएल आॅपरेटर व पँटरीबॉय अशा विविध पदांंवर एकूण ४०० कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यात २५ महिला कामगारांचाही समावेश आहे.मागील महिन्यांपासून वेतनवाढीच्या मागणीसाठी कामगारांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बोलणी सुरू होती. त्यानंतर वेतनवाढीचा करारही करण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी केलेल्या करारानुसार, वेतन देण्याच्या मागणीप्रमाणे कामगारांना वेतन दिले जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतरही वेतनवाढीच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याच्या निषेधार्थ ४०० कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आर्शिया लॉजिस्टिक व्यवस्थापनाने या कामगारांना विश्वासात न घेता, तत्काळ बाहेरून कामगार आणून कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेलेले कामगार समाधान कृष्णा तांडेल (३२) यांना व्यवस्थापनाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.कंपनी व्यवस्थापन कराराप्रमाणे कामगारांना वेतन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तसेच बळाचा वापर करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आर्शिया करत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. ४०० संघटित कामगारांनी आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस विरोधातील काम बंद आंदोलन आणखीनच तीव्र केले आहे. व्यवस्थापन आणि कामगारांमधील संघर्ष आणखीनच पेटला आहे.