शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 07:07 IST

आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. मार्चपासून जवळपास १३७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती निवारण निधीतून २५१ कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनास दिला आहे. आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निदर्शनास येताच, महानगरपालिकेने तत्काळ संपूर्ण लक्ष कोरोना नियंत्रण व उपाययोजनांवर केंद्रित केले. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. रुग्णवाढीचा अंदाज लक्षात घेऊन वाढीव बेड्स, औषध खरेदी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील रुग्णसंख्या ३० हजार झाली असून, आतापर्यंत २६ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. साडेसहाशे नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रतिदिन ३०० ते ४०० नवीन रुग्ण वाढत असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. महानगरपालिकेने मार्चपासून जवळपास १३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्चाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे.कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मालमत्ता, पाणी व इतर करांतून येणारी रक्कम वेळेत मिळत नाही. खर्चाचा आकडा मात्र झपाट्याने वाढत आहे. महामारीशी मुकाबला करण्यासाठी शासनाकडूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाच्या आपत्ती निवारण विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेस २५१ कोटी रुपये मिळावे, अशी मागणी महानगरपालिकेने केली आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. आतापर्यंत शासनाने महानगरपालिकेला १० कोटी ४० लाख रुपये व १ कोटी ४४ लाख रुपये आमदान निधी मिळून ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय शासनाकडून दहा अत्याधुनिक व्हेंटिलेटर्सही मिळाले आहेत.शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध झाल्यास मनपाच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात हलका होणार आहे. यामुळे प्रशासनानेही पाठपुरावा सुरू केला आहे. कोरोनाचे संकट अजून काही महिने सुरूच राहणार आहे.एमएमआर परिसरात १,२०० कोटी खर्चनवी मुंबईसह एमएमआर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिसरात पाच जिल्ह्यांमधील सर्व महानगरपालिका व काही नगरपालिकांचाही समावेश होतो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये राधास्वामी सत्संग भवनमधील कोरोना उपचार केंद्राचे उद्घाटन करताना या परिसरात आतापर्यंत १,२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. या निधीमधून नवीन रुग्णालय उभारणी, औषध पुरवठा व इतर उपकरणांचा समावेश आहे.

आतापर्यंत केलेली कामे- वाशी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेड्सचे विशेष रुग्णालय-तुर्भे राधास्वामी सत्संग भवनमध्ये ३५ हजार चौरस क्षेत्रफळावर ४११ आॅक्सिजन बेड्सचे रुग्णालय-नेरुळमधील मनपा रुग्णालयात प्रतिदिन १ हजार क्षमतेची आरटीपीसीआर लॅबची उभारणी- एपीएमसीमधील निर्यात भवनमध्ये ५१६ आॅक्सिजन बेड्स क्षमतेने रुग्णालय- सानपाडा एमजीएम रुग्णालयाच्या इमारतीत ७५ आॅक्सिजन बेड्स क्षमतेचे रुग्णालय- ऐरोली सेक्टर १५ मधील पाटीदार समाज भवनमध्ये ३०२ बेड्सचे कोविड केअर सेंटर- वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात १७५ बेड क्षमतेचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर- पनवेलमधील इंडिया बुल्स इमारतीमध्ये १,०८० बेड्सचे कोविड केअर सेंटरची उभारणी- कोपरखैरणे सेक्टर ५ मधील समाज मंदिरात ७० बेड्सची व्यवस्था- नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये १०० बेड्सची केंद्र सुरू- ऐरोली सेक्टर ५ मधील समाज मंदिरात ७६ बेड्सचे केंद्र- नेरुळ सेक्टर ९ मधील केंद्रामध्ये ५५ बेड्सचे केंद्र- सीबीडी सेक्टर ३ मधील बहुउद्देशीय केंद्रात ९६ बेड्सची व्यवस्था- वाशी सेक्टर १४ मधील बहुउद्देशीय इमारतीमध्ये १०८ बेड्सची व्यवस्था- वाशीतील ईटीसी केंद्रांमध्ये महिलांसाठी १५० बेड्सचे केअर सेंटर- डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाबरोबर २०० आयसीयू बेड्ससह ८० व्हेंटिलेटर्ससाठी करार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई