शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 2:31 AM

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. सिडको व महानगरपालिकेने आतापर्यंत ११८ जलकुंभ बांधले असून, त्यापैकी ९४ सद्यस्थितीमध्ये वापरामध्ये आहेत. शहरातील २५ जलकुंभ धोकादायक असून, तीन निष्कासित करण्यात आले आहेत.नवी मुंबई शहर बसविताना शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने शहरातील विविध नोडमध्ये २८ उच्चस्तरीय आणि ४६ भूस्तरीय जलकुंभ बांधले होते. महापालिकेच्या स्थापनेनंतर सर्वच जलकुंभ सिडकोने महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. महानगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. शहरातील नागरिकांना कराव्या लागणाऱ्या पाण्याची साठवणूक या जलकुंभांमध्ये केली जाते. आवश्यकतेनुसार महापालिकेने शहरात सुमारे १९ उच्चस्तरीय आणि २५ भूस्तरीय जलकुंभ बांधले आहेत. यामुळे एकूण जलकुंभांची संख्या ११८ झाली आहे. नव्याने ९ उच्चस्तरीय आणि १० भूस्तरीय जलकुंभ बांधण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी महासभेने मंजुरीही दिली असून, दिघा भागात एक उच्चस्तरीय आणि १ भूस्तरीय जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या जलकुंभांचे आयुष्य संपले असून, अनेक जलकुंभांना तडे गेले आहेत. जलकुंभांच्या संरक्षक भिंतींची दुरवस्था झाली असून, जलकुंभांच्या आवारात स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळेही जलकुंभांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक जलकुंभ आणि त्यांची सुरक्षा याबाबत नगरसेवकांनी अनेक वेळा महासभा आणि स्थायी समिती सभेत चर्चादेखील केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. महापालिकेने १६ उच्चस्तरीय आणि १६ भूस्तरीय जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिटही केले असून, यामध्ये सात उच्चस्तरीय आणि १८ भूस्तरीय जलकुंभ धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. वापरात नसलेल्या जलकुंभांची संख्या सुमारे १८ असून त्यापैकी तीन उच्चस्तरीय जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहेत. धोकादायक झालेल्या जलकुंभांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असून, पर्यायी सुविधा नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आयआयटीच्या माध्यमातून जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करून घेत असून, आलेल्या अहवालाप्रमाणे दुरुस्ती व इतर कामे केली जात आहेत. धोकादायक ठरविलेल्या जलकुंभांच्या जागेवर नवीन जलकुंभ उभारण्यास सुरुवात केली आहे; काही ठिकाणी निविदा प्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे काम रखडले आहे.३२ जलकुंभांचे लेखापरीक्षणमहापालिकेने आतापर्यंत ३२ जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले आहे. यामध्ये १६ उच्चस्तरीय व १६ भूस्तरीय जलकुंभांचा समावेश आहे.आवश्यकतेप्रमाणे जुन्या जलकुंभांचे लेखापरीक्षण आयआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे दुरुस्ती व पुन्हा नवीन बांधण्याचा निर्णय घेतला जात आहे.नवीन जलकुंभांचे बांधकामही सुरूमहापालिका क्षेत्रामध्ये दोन जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. १९ जलकुंभांना महापालिकेने परवानगी दिली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. वाशी सेक्टर ५ मधील जलकुंभही धोकादायक घोषित केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु निविदेस अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.शहरातील सर्व जलकुंभांची नियमित देखभाल केली जात आहे. आवश्यकतेप्रमाणे जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले जात असते व येणाºया अहवालाप्रमाणे त्यावर उचित कार्यवाही करण्यात येते. धोकादायक ठरलेल्या जलकुंभांच्या ठिकाणी व मागणीप्रमाणे नवीन जलकुंभही उभारले जात आहेत.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता,नवी मुंबई महानगरपालिकावाशी परिसरातील धोकादायक जलकुंभांविषयी सर्वसाधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये वारंवार आवाज उठविला आहे. प्रशासनाने सर्वच जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे व धोकादायक जलकुंभाच्या ठिकाणी तत्काळ नवीन जलकुंभ उभारण्यात यावेत.- दिव्या गायकवाड, नगरसेविका, प्रभाग प्रभाग ६४अपघाताची शक्यताधोकादायक घोषित केलेल्या जलकुंभांपैकी काही जलकुंभांचा अद्याप वापर सुरू आहे. वेळेत नवीन जलकुंभ उभारण्याची कार्यवाही सुरू केली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील १८ जलकुंभांचा वापर बंद असून आतापर्यंत तीन जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई