शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले

By admin | Updated: January 3, 2015 01:07 IST

शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.

नवी मुंबई : शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. नवी मुंबईमधील प्रभाग समिती व नगरसेवक निधीमधील कामे वेळेवर होत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी प्रशासनास धारेवर धरले. एक ते दीड हजार छोट्या कामांच्या निविदा झालेल्या नाहीत. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील ८ ते ९ कामांच्या फाईल तयार झाल्या आहेत. परंतु निविदा काढल्या जात नाहीत. महापालिकेस कररूपाने ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले व प्रत्यक्षात खर्च ८६० कोटींवर गेला असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे कामे उशिराने केली जात आहेत. विकासकामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले आहे. नगरसेवकांना उल्लू बनविण्याचे काम सुरू आहे. निवडणुकांपूर्वी कामे होणार का याची माहिती द्या, अशी विचारणा त्यांनी केली. सूरज पाटील यांनीही प्रभाग समितीची कामे धीम्या गतीने सुरू आहेत. हा वेग राहिला तर आता मंजूर असलेली कामे निवडणुकीनंतरच सुरू होतील अशी शक्यता व्यक्त केली. शिवसेना नगरसेवकांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली. ८९ नगरसेवकांच्या प्रभागातील अनेक जनहिताची कामे थांबली आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार याविषयी आयुक्तांनी माहिती दिली पाहिजे. आयुक्तांना सभागृहात बोलवा तोपर्यंत सभा सुरूच ठेवा अशी मागणी केली. महापालिकेच्या ई - टेंडर प्रणालीद्वारे निविदा प्रक्रिया वेळेवर होत नाहीत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने सर्व कामे कधी मार्गी लागणार याविषयी स्पष्ट भूमिका सांगावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले होते. आयुक्त सभागृहामध्ये येईपर्यंत सभा तहकूब करा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे प्रशासन उपआयुकत जगन्नाथ सिन्नरकर यांनी मंजूर असलेली सर्व विकासकामांची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाईल. निवडणुकीपूर्वी कामे सुरू करण्यात येणार असून कोणतीही कामे रखडविली जाणार नसल्याचे स्पष्ट करून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शासनाने नोव्हेंबर २०१४ ला अध्यादेश काढून सर्व शासकीय संस्थांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कामांसाठी ई -निविदेचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. परंतु स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी यास तीव्र विरोध केला. महापालिकेत सद्यस्थितीमध्ये निविदा प्रक्रिया धीम्या गतीने होत आहे. ३ लाखांपेक्षा जास्त कामासाठीही ही प्रक्रिया राबविली तर विकासकामे रखडतील त्यामुळे पुढील एक महिना या निर्णयाची अंमलबजावणी केली जावू नये असा आग्रह धरला व नगरसेवकांचा विरोध शासनास कळविण्यात यावा अशी सूचना केली. अधिकारी निरुत्तरच्स्थायी समितीमध्ये सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते. ई - निविदेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर हरकत घेतली जात होती. त्यांनी रिंग होऊ नये यासाठी ई - निविदा आवश्यक असल्याचे शासनाचे मत असल्याचे सांगितले. परंतु नगरसेवकांनी रिंग होते असा अर्थ काढून त्यांना धारेवर धरले. अखेर त्यांनी शब्द मागे घेतले. प्रश्नांचा भडिमार थांबत नसल्याने सर्वच अधिकारी निरुत्तर झाले होते.