शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

एपीएमसीमधून 1500 किलो प्लास्टिक जप्त; प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:57 PM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात मोहीम राबविली.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने  प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात मोहीम राबविली. दोन दिवसांमध्ये 1500 किलो  प्लास्टिक जप्त केले असून, 35 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

नवी मुंबईमध्ये सर्वाधिक प्लास्टिकची विक्री व वापर बाजार समिती परिसरामध्ये होऊ लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी धाडी टाकून प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. महानगरपालिकेनेही यापूर्वी अनेक वेळा धाडी टाकून प्लास्टिकची विक्री करणा-यांवर कारवाई केली आहे. यानंतर दोन दिवस बाजार समिती व एमपीसीबीच्या अधिका-यांनी मसाला मार्केटमध्ये संयुक्त मोहीम राबविली. पहिल्या दिवशी 200 किलो व दुस-या दिवशी तब्बल 1300 किलोचा साठा हस्तगत केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी केतन पाटील, इंद्रजीत देशमुख, बाजार समितीचे किरण घोलप, सी. टी. पवार, आर. आर. गुरव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.

बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्येही मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे.  या ठिकाणी परराज्यातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. इतर राज्यांमध्ये बंदी नसल्याने तेथून प्लॅस्टिकमध्ये भरून कृषी माल विक्रीसाठी पाठविण्यात येतो. एमपीसीबीच्या पथकाने मार्केटमध्ये जनजागृती केली. माल पाठविणा-यांनाही  प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. 

व्यापा-याने दिली चिल्लरप्लास्टिक सापडलेल्या व्यापा-यांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रॉयल मसाला व ड्रायफ्रुट कंपनीच्या दुकानदाराने 5 हजार रुपयांची चिल्लर दंड स्वरूपात दिली. यामुळे कारवाई करणा-या पथकाला चिल्लर मोजण्यास खूप वेळ गेला. कारवाई करणा-यांना मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटाची आठवण झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई