शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य

By नारायण जाधव | Updated: September 6, 2023 20:06 IST

मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे.

नवी मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. या मार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे राज्यांतर्गत हा पहिलाच बुलेट प्रकल्प असून, तो समद्धी महामार्गाला समांतर असा राहणार आहे.

या बुलेट प्रकल्पाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या मार्गाची लांबी ७६६ किलोमीटर आहे. हा मार्ग ६८ टक्के समृद्धी महामार्गाला समांतर असा असल्याने त्यासाठी आवश्यक जमीनदेखील कमी लागणार आहे. या प्रकल्पाकरिता १२६० हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. तो राज्यातील अकरा जिल्ह्यांमधून जाणारा असून, याव्यतिरिक्त इतर १३ जिल्ह्यांना त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. ही आहेत प्रस्तावित १३ बुलेट ट्रेन स्थानकेया बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहाँगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे. नऊ ते दहा तास वेळ वाचणारसध्या जर आपण नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो; परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे. बुलेट ट्रेनचा ताशी वेग ३५९ किलोमीटर असणार असून, प्रत्यक्षात २५० किलोमीटर प्रतितासाचा वेग आपल्याला मिळेल, असा अंदाज आहे. प्रतिकिमी २३२ कोटी रुपये खर्चाचा अंदाजप्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटरकरिता २३२ कोटी रुपये इतका येईल, असा अंदाज असून, त्यानुसार एकूण एक लाख ७० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षामुंबई-नागपूर प्रकल्पाचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करून २०२१ मध्ये त्याचा हवाई लीडार सर्वेक्षणदेखील केले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पसून या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर तो मार्च २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला होता. तो बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करता येणार आहे.  हे आहेत प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग१ दिल्ली-वाराणसी (८६५ किमी)२. मुंबई-नागपूर (७५३ किमी)३. दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी)४. चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी)५. दिल्ली-अमृतसर (४५९ किमी)६. मुंबई-हैदराबाद (७११ किमी)७. वाराणसी-हावडा (७६० किमी)(कॉरिडोरची उल्लेखित लांबी ही अंदाजित असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर ती बदलू शकते.) मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील नियोजित स्थानकेयातील मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश असून, महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून ती धावणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ९ किमीचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधितठाण्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन तीत जाणार आहे. तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांत अजूनही मतभेद आहेत; तसेच ठाणे जिल्ह्यातील उपरोक्त गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधित होणार आहे. हे अडथळे पार करावे लागणारमोठ्याप्रमाणात शेतजमिनीसह वनजमीन बाधित होणार आहे. त्यामुळे डीपीआरनंतर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली तरी सीआरझेड आणि वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आणि भूसंपादनाचे अडथळे पार करावे लागणार आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईnagpurनागपूर