शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य

By नारायण जाधव | Updated: September 6, 2023 20:06 IST

मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे.

नवी मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. या मार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे राज्यांतर्गत हा पहिलाच बुलेट प्रकल्प असून, तो समद्धी महामार्गाला समांतर असा राहणार आहे.

या बुलेट प्रकल्पाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या मार्गाची लांबी ७६६ किलोमीटर आहे. हा मार्ग ६८ टक्के समृद्धी महामार्गाला समांतर असा असल्याने त्यासाठी आवश्यक जमीनदेखील कमी लागणार आहे. या प्रकल्पाकरिता १२६० हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. तो राज्यातील अकरा जिल्ह्यांमधून जाणारा असून, याव्यतिरिक्त इतर १३ जिल्ह्यांना त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. ही आहेत प्रस्तावित १३ बुलेट ट्रेन स्थानकेया बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहाँगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे. नऊ ते दहा तास वेळ वाचणारसध्या जर आपण नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो; परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे. बुलेट ट्रेनचा ताशी वेग ३५९ किलोमीटर असणार असून, प्रत्यक्षात २५० किलोमीटर प्रतितासाचा वेग आपल्याला मिळेल, असा अंदाज आहे. प्रतिकिमी २३२ कोटी रुपये खर्चाचा अंदाजप्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटरकरिता २३२ कोटी रुपये इतका येईल, असा अंदाज असून, त्यानुसार एकूण एक लाख ७० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षामुंबई-नागपूर प्रकल्पाचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करून २०२१ मध्ये त्याचा हवाई लीडार सर्वेक्षणदेखील केले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पसून या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर तो मार्च २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला होता. तो बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करता येणार आहे.  हे आहेत प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग१ दिल्ली-वाराणसी (८६५ किमी)२. मुंबई-नागपूर (७५३ किमी)३. दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी)४. चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी)५. दिल्ली-अमृतसर (४५९ किमी)६. मुंबई-हैदराबाद (७११ किमी)७. वाराणसी-हावडा (७६० किमी)(कॉरिडोरची उल्लेखित लांबी ही अंदाजित असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर ती बदलू शकते.) मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील नियोजित स्थानकेयातील मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश असून, महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून ती धावणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ९ किमीचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधितठाण्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन तीत जाणार आहे. तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांत अजूनही मतभेद आहेत; तसेच ठाणे जिल्ह्यातील उपरोक्त गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधित होणार आहे. हे अडथळे पार करावे लागणारमोठ्याप्रमाणात शेतजमिनीसह वनजमीन बाधित होणार आहे. त्यामुळे डीपीआरनंतर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली तरी सीआरझेड आणि वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आणि भूसंपादनाचे अडथळे पार करावे लागणार आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईnagpurनागपूर