शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 13:35 IST

पुढच्या काही काळात एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील बहुतांश घटकपक्षांनीही दमदार कामगिरी केली. एनडीएतील घटक पक्षांनी काल मोदींनी आपल्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारुण पराभव करून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर 303 जागा जिंकल्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये भक्कम बहुमत पाठीशी असलेल्या एनडीएचा अजून विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज दिल्ली येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर जगनमोहन रेड्डींनी अमित शहांचीही भेट घेतल्याने ते एनडीएमध्ये प्रवेश करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या भेटीवेळी जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थिर राहण्याचे निमंत्रण दिले. तसेच आंध्र प्रदेशमधील विविध विकासकामांविषयी मोदींसोबत चर्चा केली. यावेळी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मागणीचा रेड्डींनी पुनरुच्चार केला. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 175 पैकी 151 तर लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 22 जागा मिळाल्या आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण