शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पुढील 15-20 वर्षे तुमचा नंबर येणार नाही..; राज्यसभेतून अमित शाहांची विरोधकांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:42 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक-2024 वरील चर्चेला उत्तर दिले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शाहांनी आज आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक-2024 वर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, गेल्या 10 वर्षात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे आपण राष्ट्रीय तसेच प्रादेशिक आणि जागतिक शक्ती म्हणून उदयास आलो आहोत, हे आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे विधेयक देशाची यशोगाथा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आहे. इथे कोणी गैरसमज करून घेऊ नये. मी सरकारच्या यशोगाथेबद्दल बोलत नाही, तर देशाच्या यशोगाथेबद्दल बोलत आहे. पुढील 15-20 वर्षे कुणाचाच नंबर येणार नाही. जे काही काम करायचे आहे, ते आम्हालाच करायचे आहे, असा टोला शाहांनी लगावला.

गृहमंत्री पुढे म्हणाले, काही सदस्यांनी दुरुस्तीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. मला त्यांना सांगायचे आहे की, एखादी इमारत वेळीच दुरुस्त केली नाही तर ती कोसळते. त्यांना वाटते की, कदाचित ते येतील आणि बदलतील, पण पुढची 15-20 वर्षे विरोधकांची सत्ता येणार नाही. जे काही करायचे आहे, ते आम्हालाच करायचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आला. या अंतर्गत NDMA, SDMA आणि DDMA ची स्थापना करण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन हा केंद्र आणि राज्यांचा विषयशाहा पुढे म्हणाले, आता सत्तेचे केंद्रीकरण होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जर तुम्ही संपूर्ण विधेयक काळजीपूर्वक वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की अंमलबजावणीची सर्वात मोठी जबाबदारी राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे फेडरल रचनेचे कोणतेही नुकसान होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन हा केंद्र आणि राज्य सरकारचा विषय आहे. 

आपत्तींचे स्वरूप आणि प्रमाण बदलले आपत्तीचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलूया. हजारो वर्षांपासून आपण निसर्गाच्या संवर्धनाबद्दल बोलत आहोत. आपत्तींच्या पद्धती आणि स्केल बदलले आहेत, त्यानुसार ते बदलावे लागतात, म्हणूनच हे विधेयक आणले आहे. सर्व लोकांकडून आलेल्या 87 टक्के सूचना स्वीकारुन आम्ही हे विधेयक आणले असल्याची माहिती शाहांनी दिली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस