शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...तर तुमचे आधार कार्ड ठरेल निरुपयोगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 18:28 IST

केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर ...

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर तुमच्या आधार कार्डचा क्यूआर कोड काम करणे बंद करेल. तसेच आधार कार्डमधील तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. यूआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणाऱ्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर आधार कार्डमधील तुमची गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते अशी भीती यूआयडीएआयने व्यक्त केली आहे. आधार कार्डचा एक वेगळा भाग आणि मोबाइल आधार पूर्णपणे वैध असल्याचेही यूआयईएआयने सांगितले. आधार स्मार्टकार्डच्या प्रिंटींगवर 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अनावश्यक असल्याचे यूआयईडीएआयचे म्हणणे आहे.  प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी स्मार्ट कार्ड अनावश्यक असतात. त्यामुळे क्विक रिस्पॉन्स कोड काम करणे बंद करते. तसेच या प्रकारच्या अनधिकृत प्रिंटिंगमुळे क्यूआर कोड काम करणे बंद करू शकते.  वरील कारणांशिवाय तुमच्या मंजुरीशिवाय चुकीच्या व्यक्तींकडे तुमची माहिती जाऊ शकते, अशी माहितीही आधार एजन्सीकडून देण्यात आलेली आहे. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे म्हणाले की, प्लॅस्टिकचे आधार स्मार्ट कार्ड पूर्णपणे अनावश्यक आणि निरर्थक आहे. मात्र सर्वसाधारण कागदावर डाऊनलोक करण्यात आलेले आधार कार्ड किंवा मोबाईल आधार कार्ड मात्र वैध असेल.  आता तुमचा चेहरा बनणार आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.1 जूनपासून नवी सोय‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल. थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकार