शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

...तर तुमचे आधार कार्ड ठरेल निरुपयोगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 18:28 IST

केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर ...

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर तुमच्या आधार कार्डचा क्यूआर कोड काम करणे बंद करेल. तसेच आधार कार्डमधील तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. यूआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणाऱ्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर आधार कार्डमधील तुमची गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते अशी भीती यूआयडीएआयने व्यक्त केली आहे. आधार कार्डचा एक वेगळा भाग आणि मोबाइल आधार पूर्णपणे वैध असल्याचेही यूआयईएआयने सांगितले. आधार स्मार्टकार्डच्या प्रिंटींगवर 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अनावश्यक असल्याचे यूआयईडीएआयचे म्हणणे आहे.  प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी स्मार्ट कार्ड अनावश्यक असतात. त्यामुळे क्विक रिस्पॉन्स कोड काम करणे बंद करते. तसेच या प्रकारच्या अनधिकृत प्रिंटिंगमुळे क्यूआर कोड काम करणे बंद करू शकते.  वरील कारणांशिवाय तुमच्या मंजुरीशिवाय चुकीच्या व्यक्तींकडे तुमची माहिती जाऊ शकते, अशी माहितीही आधार एजन्सीकडून देण्यात आलेली आहे. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे म्हणाले की, प्लॅस्टिकचे आधार स्मार्ट कार्ड पूर्णपणे अनावश्यक आणि निरर्थक आहे. मात्र सर्वसाधारण कागदावर डाऊनलोक करण्यात आलेले आधार कार्ड किंवा मोबाईल आधार कार्ड मात्र वैध असेल.  आता तुमचा चेहरा बनणार आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.1 जूनपासून नवी सोय‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल. थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकार