शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

तरुणांनो, सरकारी नोकऱ्यांमागे धावू नका; पान टपरी सुरू करा- बिप्लब देव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:29 IST

अजब विधानांची मालिका सुरूच

त्रिपुरा: महाभारतातील इंटरनेट, डायना हेडन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी तरुणांना अजब सल्ला दिलाय. सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा पान टपरी सुरू करा, असं अजब विधान देव यांनी केलंय. 'सरकारी नोकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे राजकीय पक्षांच्या मागे फिरुन वेळ वाया घालवण्यापेक्षा तरुणांनी पान टपरी सुरू करावी,' असं देब म्हणाले.तरुणांनी स्वत:चा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करावा, असं देब यांनी सांगितलं. 'तरुणांनी स्वयंरोजगार मिळवावा. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घ्यावं. पान टपरी सुरू करण्यासोबतच पशुपालन क्षेत्रातही तरुणांना व्यवसायाची संधी आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रातही तरुणांना चांगला वाव आहे,' असं देब म्हणाले. त्रिपुरा पशुवैद्यकीय परिषदेनं आयोजित केलेल्या एका शिबिरात ते बोलत होते. 'कोणत्याही तरुणानं बँकेकडून किमान 75 हजार रुपयांचं कर्ज घेतलं, तरी तो महिन्याला किमान 25 हजार रुपये कमावू शकतो,' असंही देब यांनी म्हटलं.तरुण त्यांच्या संकुचित मानसिकतेमुळे व्यवसायाकडे वळत नाहीत, असंही देब म्हणाले. यासाठी त्यांनी त्रिपुरात 25 वर्षे सत्तेत असलेल्या माकपला जबाबदार धरलं. 'पदवीधर तरुण शेतीकडे वळू शकत नाहीत. त्यांनी कुक्कुटपालन करु नये, अशा संकुचित विचारांमुळेच बेरोजगारी वाढली,' असंही देब यांनी म्हटलं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी महिन्यात दिलेल्या मुलाखतीत रोजगाराबद्दल अजब विधान केलं होतं. या मुलाखतीत मोदींना देशातील रोजगार निर्मितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, 'एखादी व्यक्ती रस्त्यावर पकोडे विकत असेल, तर त्याला रोजगार म्हणणार नाही का?,' असा प्रतिप्रश्न मोदींनी केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

टॅग्स :Tripuraत्रिपुरा