शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना मंत्री जयशंकर यांनी केला बजरंगबलीचा उल्लेख, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 21:42 IST

S Jaishankar Lord Hanuman Foreign Policy: हनुमानासमोर सर्वात मोठे आव्हान काय होते? त्याबाबतही जयशंकर बोलले

S Jaishankar Lord Hanuman Foreign Policy: पुराणातली वांगी पुराणात अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की जुन्या घडून गेलेल्या गोष्टींचा आधुनिक घटनांशी काहीही संबंध लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मात्र या म्हणीला बगल देत, परराष्ट्र धोरणाचा थेट बजरंग बलीशी संबंध जोडला. दिल्ली विद्यापीठातील साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणाबाबत भगवान हनुमानाचा उल्लेख केला. लंकेतील रावणाच्या दरबारातील हनुमानाची भेट याची तुलना जयशंकर यांनी परराष्ट्र कूटनितीशी केली आणि सांगितले की मित्रदेशांची संख्या जास्तीत जास्त वाढवणे हेच भारताचे उद्दिष्ट आहे.

शनिवारी दिल्ली विद्यापीठ साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त ते म्हणाले, "हनुमानाचे कर्तृत्व पाहा. त्याला भगवान श्रीरामांनी शत्रूच्या प्रदेशात पाठवले होते. त्याला सांगण्यात आलं होतं की तिथे जा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सीतामातेला भेट. यात सर्वात कठीण भाग होता तो म्हणजे सीतामातेला भेटून तिच्याशी संवाद साधणे आणि तिला धीर देणे. हनुमान प्रत्यक्षात तेथे गेला आणि नंतर मुत्सद्दीपणाने रावणाला शरण गेला. त्यावेळी त्याने रावणाच्या दरबारातील न्यायदानाची पद्धत समजून घेतली."

"जेव्हा तुम्ही परराष्ट्र धोरणाच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलता तेव्हा ते कशाबद्दल असते, ही एकप्रकारची सामान्यज्ञानाची बाब आहे. तुमच्या मित्रांची संख्या कशी वाढवायची? तुम्ही त्यांना कोणत्याही कामासाठी कसा प्रस्ताव देता? तुम्ही त्याचे व्यवस्थापन कसे करता? याबाबी लक्षात घ्यायला हव्यात. कारण कधीकधी तुमच्याकडे लोकांचा एक मोठा गट असतो, अशा वेळी तुम्ही त्या सर्वांना कसे एकत्र कसे ठेवता हे महत्त्वाचे आहे. आज आपण भारतात मित्रराष्ट्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही वेगवेगळ्या देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत," अशी भूमिका त्यांनी मांडली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरHanuman Jayantiहनुमान जयंतीministerमंत्री