शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन; BJP ला १५० जागांवर रोखण्याचा महाबैठकीत प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 09:10 IST

या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली - तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन. आजच्या बैठकीत रणनीती बनण्याची अपेक्षा नाही. परंतु आपल्या पुढच्या २-३ बैठकांमध्ये रणनीती आखली जाऊ शकते. आपण भाजपाला १५० जागांपर्यंत रोखू शकतो. कारण त्यांच्याकडे केवळ ३७ टक्के मते आहेत असं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या महाबैठकीत केले. शुक्रवारी पाटणा इथं विरोधकांची बैठक झाली. त्यात १५ विरोधी पक्षाचे २७ प्रमुख नेते उपस्थित होते. 

या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपाचा पराभव निश्चित आहे. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आणि अंतिम बैठक १२ जुलैला शिमला इथं होईल. या बैठकीत कोण कोणत्या जागा लढवेल याबाबत निर्णय घेतला जाईल. 

या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी सांगितले की, आम्ही या बैठकीला जुन्या सर्व गोष्टी विसरून आलो आहे. आमच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नाही. भाजपा देशात हुकुमशाही पद्धतीने सर्व लोकशाही संस्था उद्ध्वस्त करत आहे. आपल्याला त्यांच्याशी लढायचंय असं त्यांनी बैठकीत मत मांडले. भारताच्या लोकशाहीच्या ढाच्यावर हल्ला केला जातोय. विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही विचारधारेची लढाई आहे. भाजपा आणि आरएसएसचे आक्रमक थांबवायला हवे असंही ते म्हणाले. 

वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चालआम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस