शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन; BJP ला १५० जागांवर रोखण्याचा महाबैठकीत प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 09:10 IST

या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली - तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन. आजच्या बैठकीत रणनीती बनण्याची अपेक्षा नाही. परंतु आपल्या पुढच्या २-३ बैठकांमध्ये रणनीती आखली जाऊ शकते. आपण भाजपाला १५० जागांपर्यंत रोखू शकतो. कारण त्यांच्याकडे केवळ ३७ टक्के मते आहेत असं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या महाबैठकीत केले. शुक्रवारी पाटणा इथं विरोधकांची बैठक झाली. त्यात १५ विरोधी पक्षाचे २७ प्रमुख नेते उपस्थित होते. 

या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपाचा पराभव निश्चित आहे. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आणि अंतिम बैठक १२ जुलैला शिमला इथं होईल. या बैठकीत कोण कोणत्या जागा लढवेल याबाबत निर्णय घेतला जाईल. 

या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी सांगितले की, आम्ही या बैठकीला जुन्या सर्व गोष्टी विसरून आलो आहे. आमच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नाही. भाजपा देशात हुकुमशाही पद्धतीने सर्व लोकशाही संस्था उद्ध्वस्त करत आहे. आपल्याला त्यांच्याशी लढायचंय असं त्यांनी बैठकीत मत मांडले. भारताच्या लोकशाहीच्या ढाच्यावर हल्ला केला जातोय. विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही विचारधारेची लढाई आहे. भाजपा आणि आरएसएसचे आक्रमक थांबवायला हवे असंही ते म्हणाले. 

वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चालआम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस