शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

'देशाबाहेर ख्रिश्चन असल्याचं सांगतात आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू होतात', योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:59 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर सडेतोड टीका'राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात''हिंदूंना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे'

लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हा सगळा मुर्खपणा असल्याचं सांगितलं. 

'काँग्रेसने नेहमीच समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांना समाजात तेढ निर्माण केलं आणि आता हिंदूंना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे', असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'हिंदूंमध्ये कोणीही तुम्ही जानवे घातलं आहे का असं विचारत नाही, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. पण एखादी व्यक्ती देशाबाहेर गेल्यावर ख्रिश्चन असल्याचं सांगते आणि इथे आल्यावर जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत असेल तर हा मुर्खपणा आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. 'हे सगळं ती व्यक्ती म्हणत आहे, ज्याच्या पक्षाने कधीच राम आणि कृष्णाचं अस्तित्व मान्य केलं नाही. गुजरातच्या जनतेने राहुल गांधींना मंदिरात जायला आणि आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगायला भाग पाडलं', असा टोला योगी आदित्यनाथांनी लगावला आहे. 

गुजरात निवडणुकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल विचारलं असता योगी आदित्यनाथ बोलले की, 'राहुल गांधींचं वय 46-47 झालं आहे, पण अजून त्यांना काहीच समजत नाही. त्यांना जे वाचायला दिलं जात, तेच पुढे रेटतात, तेच बोलतात. आपण काय बोलतोय, त्याचा अर्थ काय हे त्यांना स्वत:ला माहिती नसतं'. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कार्यकर्त्यांना दिलं आहे. 

उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत भाजपाला जबरदस्त यश मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून, 16 पैकी 14 शहरांची महापौरपदे भाजपाकडे गेली आहेत. दोन महापौरपदे बहुजन समाज पार्टीकडे गेली असून, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा पराभव झाला आहे. गुजरात निवडणुकीआधी हा निकाल काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी मात्र स्थानिक निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. ज्याचं सरकार आहे त्यांचा दबदबा जास्त असतो असं सांगत याचा गुजरात निवडणुकीवर परिणाम होणार नाही असा दावा केला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदूBJPभाजपा