शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

'देशाबाहेर ख्रिश्चन असल्याचं सांगतात आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू होतात', योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:59 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर सडेतोड टीका'राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात''हिंदूंना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे'

लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हा सगळा मुर्खपणा असल्याचं सांगितलं. 

'काँग्रेसने नेहमीच समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांना समाजात तेढ निर्माण केलं आणि आता हिंदूंना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे', असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'हिंदूंमध्ये कोणीही तुम्ही जानवे घातलं आहे का असं विचारत नाही, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. पण एखादी व्यक्ती देशाबाहेर गेल्यावर ख्रिश्चन असल्याचं सांगते आणि इथे आल्यावर जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत असेल तर हा मुर्खपणा आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. 'हे सगळं ती व्यक्ती म्हणत आहे, ज्याच्या पक्षाने कधीच राम आणि कृष्णाचं अस्तित्व मान्य केलं नाही. गुजरातच्या जनतेने राहुल गांधींना मंदिरात जायला आणि आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगायला भाग पाडलं', असा टोला योगी आदित्यनाथांनी लगावला आहे. 

गुजरात निवडणुकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल विचारलं असता योगी आदित्यनाथ बोलले की, 'राहुल गांधींचं वय 46-47 झालं आहे, पण अजून त्यांना काहीच समजत नाही. त्यांना जे वाचायला दिलं जात, तेच पुढे रेटतात, तेच बोलतात. आपण काय बोलतोय, त्याचा अर्थ काय हे त्यांना स्वत:ला माहिती नसतं'. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कार्यकर्त्यांना दिलं आहे. 

उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत भाजपाला जबरदस्त यश मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून, 16 पैकी 14 शहरांची महापौरपदे भाजपाकडे गेली आहेत. दोन महापौरपदे बहुजन समाज पार्टीकडे गेली असून, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा पराभव झाला आहे. गुजरात निवडणुकीआधी हा निकाल काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी मात्र स्थानिक निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. ज्याचं सरकार आहे त्यांचा दबदबा जास्त असतो असं सांगत याचा गुजरात निवडणुकीवर परिणाम होणार नाही असा दावा केला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदूBJPभाजपा