शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:11 IST

येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे.

लखनौ :दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता अ‍ॅक्शनच्या तयारीत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ती ठिकाणे रिकामी करा, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. एवढेच नाही, तर शेतकरी जेथे आंदोलन करत आहेत, त्यांनी आजच ती ठिकाणं सोडावीत. त्या सर्वांना घरी जाण्यासाठी सरकार मोफेत सुविधा देईल, असेही सरकारने म्हटले आहे. 

यासाठी गाझीपूर सीमेवर बसेरदेखील पोहोचल्या आहेत. सध्या येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. तसेच मथुरा आणि आग्र्यात सुरू असेलेली आंदोलनं संपली आहेत. बरेली, बागपत, नोएडा आणि बुलंदशहरातीलही आंदोलनं संपुष्टात आली आहेत.यूपी गेटवर अद्यापही काही लोक -उत्तर प्रदेशचे एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 26 जानेवारीला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी स्वेच्छेने चिल्ला बॉर्डर आणि दलित प्रेरणा स्थळावरून आंदोलन मागे घेतले. बागपत येथे लोकांना समजावल्यानंतर त्यांनीही रात्री आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, यूपी गेटवर अद्यापही काही लोक आहेत. पण, त्यांची संख्या अत्यंत कमी आहे.राजधानी दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. यानंतर आता या आंदोलनाशी संबंधित शेतकरी संघटना स्वतःच आंदोलन संपवत असल्याच्या घोषणा करत आहेत.

दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाdelhi violenceदिल्ली