शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

'येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये बरंच काही होणार आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 10:37 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही' असे वक्तव्य केले.

ठळक मुद्दे 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही'पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे गुरुवारी (8 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते त्यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते. बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले. 

पूर्णिया/पाटणा - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये गुरुवारी 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही' असे वक्तव्य केले आहे. 

पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे गुरुवारी (8 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  'भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात. फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभ मेळ्याला येणारे प्रयागराजला येतात अलाहाबादला नव्हे. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार आहे. चिंता करू नका' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांचे बिहारबाबतच्या धारणेत परिवर्तन झाले आहे. आम्ही विरोधकांसारखे देश तोडण्याची भाषा करत नाही, असेही योगी म्हणाले. तसेच आम्ही शहीद होणाऱ्या आमच्या प्रत्येक जवानांसाठी सीमेपलिकडचे 100 सैनिक मारण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगितले. यावेळी त्यांनी बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त निधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच, गोसंवर्धनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्यात गोशाळा व्यवस्थापनासाठी 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. योगी सरकारने यावेळी 4 लाख 70 हजार 684 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRam Mandirराम मंदिरBJPभाजपाBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश