शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:27 IST

'परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, प्रश्न उपस्थित करणारा सत्याग्रहाबद्दल बोलत आहे.'

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या राजघाटावरील सत्याग्रह आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, "जे लोक लोकशाही कमकुवत करतात ते सत्याग्रह करू शकत नाहीत. भाषावाद आणि प्रादेशिकवादाच्या आधारे देशाचे विभाजन करणारेही सत्याग्रह करू शकत नाहीत. ज्यांना माणसांबद्दल सहानुभूती नाही, त्यांना सत्याग्रहाचा अधिकार नाही.' रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना योगींनी ही टीका केली.

संबंधित बातमी- 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, 'गांधीजींनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसेला सर्वाधिक स्थान दिले. या गोष्टीसाठी त्यांनी फक्त विनंती केली. त्यांच्या विनंतीला सत्याग्रह म्हणतात. अनेकांना देशावर राज्य करण्याची संधी मिळाली, पण ज्यांना माणसांबद्दल भावना नाही, ते सत्याग्रह कसा करतील? असत्याच्या मार्गावर चालणारा सत्याग्रहाबद्दल बोलू शकत नाही. प्रचंड भ्रष्टाचारात बुडलेले लोक सत्याग्रह करू शकत नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'सत्याग्रह म्हणजे मन, शब्द आणि कृती. ज्यांचे आचार-विचार, शब्द आणि कृती भिन्न आहेत, ते सत्याग्रह करू शकत नाही. परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, आपल्याच देशावर प्रश्न उपस्थित करणारा आणि आणि ज्याच्या मनात देशाच्या शूर सैनिकांबद्दल आदर नाही, तो सत्याग्रहाबद्दल बोलत असेल, तर ही मोठी विडंबना आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा