शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:27 IST

'परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, प्रश्न उपस्थित करणारा सत्याग्रहाबद्दल बोलत आहे.'

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या राजघाटावरील सत्याग्रह आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, "जे लोक लोकशाही कमकुवत करतात ते सत्याग्रह करू शकत नाहीत. भाषावाद आणि प्रादेशिकवादाच्या आधारे देशाचे विभाजन करणारेही सत्याग्रह करू शकत नाहीत. ज्यांना माणसांबद्दल सहानुभूती नाही, त्यांना सत्याग्रहाचा अधिकार नाही.' रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना योगींनी ही टीका केली.

संबंधित बातमी- 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, 'गांधीजींनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसेला सर्वाधिक स्थान दिले. या गोष्टीसाठी त्यांनी फक्त विनंती केली. त्यांच्या विनंतीला सत्याग्रह म्हणतात. अनेकांना देशावर राज्य करण्याची संधी मिळाली, पण ज्यांना माणसांबद्दल भावना नाही, ते सत्याग्रह कसा करतील? असत्याच्या मार्गावर चालणारा सत्याग्रहाबद्दल बोलू शकत नाही. प्रचंड भ्रष्टाचारात बुडलेले लोक सत्याग्रह करू शकत नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'सत्याग्रह म्हणजे मन, शब्द आणि कृती. ज्यांचे आचार-विचार, शब्द आणि कृती भिन्न आहेत, ते सत्याग्रह करू शकत नाही. परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, आपल्याच देशावर प्रश्न उपस्थित करणारा आणि आणि ज्याच्या मनात देशाच्या शूर सैनिकांबद्दल आदर नाही, तो सत्याग्रहाबद्दल बोलत असेल, तर ही मोठी विडंबना आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा