शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 13:23 IST

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे

नवी दिल्ली - देशाच्या जुन्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या घटनेच्या २२ वर्षानंतर म्हणजेच १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा नव्या संसदेत घुसकोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, देशाच्या संसद भवनातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सुरक्षेवरुन देशाच्या सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. तर, आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, चारही आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शाह दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे. तत्पूर्वी संसदेतील घुसकोरीवरुन खासदार संजय राऊत यांनी देशाच्या सीमारेषांवरील घुसकोरीचा प्रश्न उपस्थित केला. 

देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला. 

देशाच्या संसदेची सुरक्षा, जिथे चोख बंदोबस्त असतो. त्या संसदेत काही मुलं घुसली, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती ते ठिक. पण, सभागृहात त्यांनी उड्या मारल्या, गोंधळ निर्माण झाला. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत, हे सरकार गेल्या महिनाभरापासून निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे, शपथग्रहणमध्ये व्यस्त आहे आणि देशाची सुरक्षा हवेत आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला. 

हल्लेखोरांचे म्हणणे काय?

चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनासारख्या मुद्द्यांवर आपण नाराज आहोत. मणिपूरचे संकट, बेरोजगारी हे मुद्देही आहेत. म्हणूनच आपण हे पाऊल उचचले.

आयबीने दिला होता अलर्ट

इंटेलिजन्स ब्युरोने केंद्रीय तपास यंत्रणा व सरकारला अलर्ट दिला होता.  कॅनडातील अतिरेकी पन्नू हा भारतातील संसदेवर हल्ला करू शकतो, असे म्हटले होते.  

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतParliamentसंसदCrime Newsगुन्हेगारीchinaचीनladakhलडाख