शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 12:21 IST

येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते येडीयुराप्पा प्रयत्नशील आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी गुढघ्याला बाशिंग बांधत मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. आजच्या घडामोडी पाहून येडीयुराप्पा 12 वर्षांपूर्वीचा बदला तर घेत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. 

जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आणि भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. मात्र, या पक्षाला विधानसभा आणि लोकसभेत अपयश आल्याने पुन्हा त्यांनी 2013 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. यानंतर 2014 मध्ये ते  भाजपाचे खासदार झाले होते. तर खासदार पुत्राला आमदार केले होते. 

कुमारस्वामी आणि येडीयुराप्पा यांच्यातील वादाची पार्श्वभूमी ही 2007 मधील आहे. तेव्हा कर्नाटकमध्ये जेडीएस-भाजपाचे सरकार होते. त्यांच्यातील समझोत्यानुसार पहिली 2.5 वर्षे कुमारस्वामी आणि त्यानंतरची 2.5 वर्षे येडीयुराप्पा मुख्यमंत्री होतील असे ठरले होते. मात्र, जेव्हा कुमारस्वामींच्या मुख्यमंत्री पदाला 20 महिने पूर्ण झाले तेव्हा ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता. यामुळे भाजपाने आणि त्यांच्या मंत्र्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या वादानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि 12 नोव्हेंबरला येडीयुराप्पा मुख्यमंत्री झाले. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. 

नोव्हेंबरमध्ये येडीयुराप्पांनी मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, जेडीएसच्या वाट्याला कमी महत्वाची मंत्रिपदे आल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली. यामुळे कुमारस्वामींनी येडीयुराप्पा सरकारचा पाठिंबाच काढून घेतला. कुमारस्वामींच्या काळात येडीयुराप्पा उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मात्र, येडीयुराप्पा मुख्यमंत्री बनल्यानंतर जेडीएसला मंत्रिमंडळात दुय्यम पदे देण्याचे घाटले आणि येडीयुराप्पांना अवघ्या 7 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

यानंतर झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आणि येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, अवघ्या 7 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याचे शल्य येडीयुराप्पांना सतावत होते. त्यातच पुन्हा 2018 च्या निवडणुकीवेळी अवघ्या 2 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याने आणि त्याचेही कनेक्शन कुमारस्वामींशीच जुळल्याने येडीयुराप्पा बदला तर घेत नाहीयेत ना अशी शंका निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)