शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 12:21 IST

येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते येडीयुराप्पा प्रयत्नशील आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी गुढघ्याला बाशिंग बांधत मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. आजच्या घडामोडी पाहून येडीयुराप्पा 12 वर्षांपूर्वीचा बदला तर घेत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. 

जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आणि भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. मात्र, या पक्षाला विधानसभा आणि लोकसभेत अपयश आल्याने पुन्हा त्यांनी 2013 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. यानंतर 2014 मध्ये ते  भाजपाचे खासदार झाले होते. तर खासदार पुत्राला आमदार केले होते. 

कुमारस्वामी आणि येडीयुराप्पा यांच्यातील वादाची पार्श्वभूमी ही 2007 मधील आहे. तेव्हा कर्नाटकमध्ये जेडीएस-भाजपाचे सरकार होते. त्यांच्यातील समझोत्यानुसार पहिली 2.5 वर्षे कुमारस्वामी आणि त्यानंतरची 2.5 वर्षे येडीयुराप्पा मुख्यमंत्री होतील असे ठरले होते. मात्र, जेव्हा कुमारस्वामींच्या मुख्यमंत्री पदाला 20 महिने पूर्ण झाले तेव्हा ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता. यामुळे भाजपाने आणि त्यांच्या मंत्र्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या वादानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि 12 नोव्हेंबरला येडीयुराप्पा मुख्यमंत्री झाले. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. 

नोव्हेंबरमध्ये येडीयुराप्पांनी मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, जेडीएसच्या वाट्याला कमी महत्वाची मंत्रिपदे आल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली. यामुळे कुमारस्वामींनी येडीयुराप्पा सरकारचा पाठिंबाच काढून घेतला. कुमारस्वामींच्या काळात येडीयुराप्पा उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मात्र, येडीयुराप्पा मुख्यमंत्री बनल्यानंतर जेडीएसला मंत्रिमंडळात दुय्यम पदे देण्याचे घाटले आणि येडीयुराप्पांना अवघ्या 7 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

यानंतर झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आणि येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, अवघ्या 7 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याचे शल्य येडीयुराप्पांना सतावत होते. त्यातच पुन्हा 2018 च्या निवडणुकीवेळी अवघ्या 2 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याने आणि त्याचेही कनेक्शन कुमारस्वामींशीच जुळल्याने येडीयुराप्पा बदला तर घेत नाहीयेत ना अशी शंका निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)