शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

यावर्षी भारताचा वृद्धीदर पोहोचणार ७.४ टक्क्यांवर

By admin | Updated: May 16, 2017 01:59 IST

भारताच्या सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ७.४ टक्के राहील, असे औद्योगिक संघटना फिक्कीने म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ७.४ टक्के राहील, असे औद्योगिक संघटना फिक्कीने म्हटले आहे.फिक्कीने मार्च आणि एप्रिल २०१७ या दोन महिन्यांच्या काळात इकॉनॉमिक आऊटलूक सर्व्हे केला. त्याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, २०१७-१८ या वर्षात भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के राहील. किमान ७.० टक्के आणि कमाल ७.६ टक्के या दरम्यान वृद्धीदर राहील.फिक्कीने म्हटले की, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील सुधारणा वृद्धीदर वाढीस पोषक आहे. २०१७-१८ या वर्षात औद्योगिक क्षेत्र ६.९ टक्क्यांनी, तर सेवा क्षेत्र ८.४ टक्क्यांनी वाढेल.एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा वृद्धीदर ७.२ टक्के राहील, असे म्हटले होते. तथापि, नोटाबंदीचा संपूर्ण परिणाम अजून काही समोर आलेला नाही, तो कळायला वेळ लागेल, असेही नाणेनिधीने म्हटले होते. नोटाबंदीचा फारसा परिणाम वृद्धीदरावर होणार नसल्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी संस्थेने (सीएसओ) या आधीच व्यक्त केला आहे. भारताचा वृद्धीदर ७.० टक्के राहील, असे सीएसओने म्हटले आहे.फिक्कीने म्हटले की, कृषी क्षेत्रातील ताज्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ मध्ये डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. भारताचे स्थूल आर्थिक आधार मजबूत आहेत. नोटाबंदीचा अचानक बसलेला झटका सहन करण्यास अर्थव्यवस्था पुरेशी मजबूत आहे. नोटाबंदी झाल्या झाल्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम दिसून येत होता. तथापि, नव्या नोटा अर्थव्यवस्थेत टाकण्याची प्रक्रिया जसजशी पूर्णत्वास येत गेली, तसतसा हा परिणामही कमी होत गेला. आता अर्थव्यवस्था सुधारत आहे. कृषी क्षेत्राने चांगली झेप घेतली आहे. व्यावसायिकांचा आत्मविश्वासही वाढला आहे.