शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
5
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
6
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
7
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
8
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
9
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
10
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
11
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
12
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
13
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
14
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
15
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
16
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
17
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
18
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
19
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
20
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी यंदाचे वर्ष सर्वात वाईट; क्रिसीलचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:02 IST

शेती क्षेत्र ठरेल तारणहार

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीयअर्थव्यवस्थाही मंदीकडे वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्ष हे आर्थिक विकासात सर्वात वाईट वर्ष ठरण्याची भीती क्रिसील या पतमापन संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्याखाली पाच एवढा कमी होण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू वर्षातील वाटचालीबद्दलचा अहवाल क्रिसीलने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वरील भाकीत करण्यात आले आहे. या वर्षामध्ये पाऊस हा नेहमीप्रमाणे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याच्या आधारे शेतीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा या अहवालात गृहित धरण्यात आली आहे. शेती उत्पादनातील समाधानकारक प्रगतीने आर्थिक विकासाचा दर काहीसा वाढल्याचे क्रिसीलने स्पष्ट केले आहे.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर २५ टक्क्यांपर्यंत आक्रसण्याची भीती या अहवालात आहे. या तिमाहीतच अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान संभवते. पुढील तिमाहीत सेवा क्षेत्र, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

तीन वर्षे राहू शकेल मंदीचा प्रभाव

च्कोरोनाचा अर्थव्यवस्थेला बसणारा फटका खूप मोठा असणार आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनातील सुमारे १० टक्के रक्कम ही कायमस्वरूपी कमी होणार असल्याची शक्यता या अहवालात क्रिसीलने व्यक्त केली आहे. मंदीच्या या प्रभावातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची भीतीही वर्तविण्यात आली.

च्भारताच्या ६९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनवेळा मंदीचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागला आहे. आर्थिक वर्ष १९५८, १९६६ आणि १९८० यामध्ये मंदी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यावेळी पावसाने डोळे वटारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. यावेळी शेतीचे उत्पन्न चांगले येण्याची अपेक्षा असून, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा एकूण फटका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था