शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी यंदाचे वर्ष सर्वात वाईट; क्रिसीलचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:02 IST

शेती क्षेत्र ठरेल तारणहार

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीयअर्थव्यवस्थाही मंदीकडे वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्ष हे आर्थिक विकासात सर्वात वाईट वर्ष ठरण्याची भीती क्रिसील या पतमापन संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्याखाली पाच एवढा कमी होण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू वर्षातील वाटचालीबद्दलचा अहवाल क्रिसीलने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वरील भाकीत करण्यात आले आहे. या वर्षामध्ये पाऊस हा नेहमीप्रमाणे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याच्या आधारे शेतीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा या अहवालात गृहित धरण्यात आली आहे. शेती उत्पादनातील समाधानकारक प्रगतीने आर्थिक विकासाचा दर काहीसा वाढल्याचे क्रिसीलने स्पष्ट केले आहे.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर २५ टक्क्यांपर्यंत आक्रसण्याची भीती या अहवालात आहे. या तिमाहीतच अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान संभवते. पुढील तिमाहीत सेवा क्षेत्र, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

तीन वर्षे राहू शकेल मंदीचा प्रभाव

च्कोरोनाचा अर्थव्यवस्थेला बसणारा फटका खूप मोठा असणार आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनातील सुमारे १० टक्के रक्कम ही कायमस्वरूपी कमी होणार असल्याची शक्यता या अहवालात क्रिसीलने व्यक्त केली आहे. मंदीच्या या प्रभावातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची भीतीही वर्तविण्यात आली.

च्भारताच्या ६९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनवेळा मंदीचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागला आहे. आर्थिक वर्ष १९५८, १९६६ आणि १९८० यामध्ये मंदी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यावेळी पावसाने डोळे वटारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. यावेळी शेतीचे उत्पन्न चांगले येण्याची अपेक्षा असून, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा एकूण फटका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था