शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:46 IST

Yasin Malik Controversy: तत्कालीन सरकारच्या विनंतीवरुनच मी पाकिस्तानात हाफिज सईदची भेट घेतल्याचा दावा यासिन मलिकने केला आहे.

Yasin Malik Controversy: जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा दहशतवादी यासिन मलिक याने एक खळबळजनक दावा केला आहे. मलिकने २००६ मध्ये लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदची पाकिस्तानात भेट घेतली होती. या भेटीबद्दल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मलिकचे वैयक्तरित्या आभार मानले होते, असा दावा त्याने केला आहे.

सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकने २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मलिकला २००६ मध्ये पाकिस्तानात पाठवले होते. हाफिज सईदची भेट खासगी नव्हती, तर पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेचा भाग होती.

गुप्तचर विभागाची कथित भूमिका...

यासिन मलिकच्या दाव्यानुसार, त्याच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी गुप्तचर विभागाचे (आयबी) तत्कालीन विशेष संचालक व्ही.के. जोशी यांनी त्याची दिल्लीत भेट घेतली होती. जोशी यांनी मलिकला या संधीचा वापर करुन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी राजकीय नेत्यांसह हाफिज सईदशी संवाद साधण्याचे आवाहन केले होते.

अमित मालवीय यांची पोस्ट...

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासिन मलिकने दाखल केलेले प्रतिज्ञापत्राचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहेले, "यासिन मलिकने धक्कादायक दावा केला आहे. हा दावा खरा असेल, तर UPA सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा आणि डिप्लोमसीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात."

आपली फसवणूक झाल्याचा मलिकचा दावा

मलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, पी. चिदंबरम, आय.के. गुजराल आणि राजेश पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटी आणि बैठकींचा विस्ताराने उल्लेख केला आहे. १९९० मध्ये माझ्या अटकेनंतर मी व्ही.पी. सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवगौडा, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सलग सहा सरकारांमध्ये सक्रियपणे सहभागी होतो. 

दरम्यान, याच प्रतिज्ञापत्रातून मलिकने आपली फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. मी सरकारच्या विनंतीवरुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो. पण, या दौऱ्यानंतर 13 वर्षांनी या भेटीचा संदर्भ बदलून माझ्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि मला दहशतवादी ठरवून तुरुंगात टाकले. माझे हेतू वाईट असते, तर मी कधीही कायदेशीररीत्या पाकिस्तानला गेलो नसतो, असेही त्याने यात म्हटले आहे. मलिकच्या दाव्यावरुन देशात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीhafiz saedहाफीज सईदcongressकाँग्रेस