शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:46 IST

Yasin Malik Controversy: तत्कालीन सरकारच्या विनंतीवरुनच मी पाकिस्तानात हाफिज सईदची भेट घेतल्याचा दावा यासिन मलिकने केला आहे.

Yasin Malik Controversy: जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा दहशतवादी यासिन मलिक याने एक खळबळजनक दावा केला आहे. मलिकने २००६ मध्ये लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदची पाकिस्तानात भेट घेतली होती. या भेटीबद्दल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मलिकचे वैयक्तरित्या आभार मानले होते, असा दावा त्याने केला आहे.

सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकने २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मलिकला २००६ मध्ये पाकिस्तानात पाठवले होते. हाफिज सईदची भेट खासगी नव्हती, तर पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेचा भाग होती.

गुप्तचर विभागाची कथित भूमिका...

यासिन मलिकच्या दाव्यानुसार, त्याच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी गुप्तचर विभागाचे (आयबी) तत्कालीन विशेष संचालक व्ही.के. जोशी यांनी त्याची दिल्लीत भेट घेतली होती. जोशी यांनी मलिकला या संधीचा वापर करुन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी राजकीय नेत्यांसह हाफिज सईदशी संवाद साधण्याचे आवाहन केले होते.

अमित मालवीय यांची पोस्ट...

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासिन मलिकने दाखल केलेले प्रतिज्ञापत्राचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहेले, "यासिन मलिकने धक्कादायक दावा केला आहे. हा दावा खरा असेल, तर UPA सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा आणि डिप्लोमसीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात."

आपली फसवणूक झाल्याचा मलिकचा दावा

मलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, पी. चिदंबरम, आय.के. गुजराल आणि राजेश पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटी आणि बैठकींचा विस्ताराने उल्लेख केला आहे. १९९० मध्ये माझ्या अटकेनंतर मी व्ही.पी. सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवगौडा, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सलग सहा सरकारांमध्ये सक्रियपणे सहभागी होतो. 

दरम्यान, याच प्रतिज्ञापत्रातून मलिकने आपली फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. मी सरकारच्या विनंतीवरुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो. पण, या दौऱ्यानंतर 13 वर्षांनी या भेटीचा संदर्भ बदलून माझ्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि मला दहशतवादी ठरवून तुरुंगात टाकले. माझे हेतू वाईट असते, तर मी कधीही कायदेशीररीत्या पाकिस्तानला गेलो नसतो, असेही त्याने यात म्हटले आहे. मलिकच्या दाव्यावरुन देशात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीhafiz saedहाफीज सईदcongressकाँग्रेस