शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

यशवंत सिन्हांमुळे विरोधकांना बळ; भारतीय मजदूर संघाचीही टीका, सरकारने दखल घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:17 IST

माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या नेत्यांनी मात्र खासगीत बोलताना यशवंत सिन्हा हे नैराश्यातून विधाने करीत आहेत, त्यांना सत्तेत स्थान न मिळाल्याचा हा परिणाम आहे, अशी विधाने केली.माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले की, या सरकारमुळे अच्छे दिन तर अजिबात आले नाहीत. त्यामुळे आता हे वाईट दिवस कधी जाणार, असे देशातील जनता विचारू लागली आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची जी दशा करून ठेवली आहे, त्याविषयी अर्थतज्ज्ञांनी न घाबरता बोलायलाच हवे. आपण गेले १८ महिने आर्थिक स्थितीबाबत सातत्याने बोलत आहोत. पण सरकारने दखल घेतली नाही. आता सिन्हा यांच्याकडून सरकारला घरचा अहेरच मिळाला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने रोजगाराभिमुख प्रकल्पांवर मोठा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेत प्राण ओतण्यासाठी ५00 अब्ज रुपयांचे पॅकेज देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्याविषयी विचारता जेटली म्हणाले की, पंतप्रधानांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. ?केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सिन्हा यांच्या टीकेविषयी विचारता ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे.सरकारच्या सल्लागारांमुळे ही अवस्थाकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यशवंत सिन्हा यांचा हवाला देत मोदी सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपा व रा. स्व. संघ यांच्याशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघानेही सध्याच्या आर्थिक स्थितीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.केंद्र सरकारने जे आर्थिक सल्लागार नेमले आहेत, त्यांच्यामुळेच ही अवस्था ओढावली आहे, कामगारांचे रोजगार जात आहेत, बेरोजगारांना रोजगार मिळणे थांबले आहे, असेही भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपा