शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

यशवंत सिन्हांमुळे विरोधकांना बळ; भारतीय मजदूर संघाचीही टीका, सरकारने दखल घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:17 IST

माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या नेत्यांनी मात्र खासगीत बोलताना यशवंत सिन्हा हे नैराश्यातून विधाने करीत आहेत, त्यांना सत्तेत स्थान न मिळाल्याचा हा परिणाम आहे, अशी विधाने केली.माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले की, या सरकारमुळे अच्छे दिन तर अजिबात आले नाहीत. त्यामुळे आता हे वाईट दिवस कधी जाणार, असे देशातील जनता विचारू लागली आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची जी दशा करून ठेवली आहे, त्याविषयी अर्थतज्ज्ञांनी न घाबरता बोलायलाच हवे. आपण गेले १८ महिने आर्थिक स्थितीबाबत सातत्याने बोलत आहोत. पण सरकारने दखल घेतली नाही. आता सिन्हा यांच्याकडून सरकारला घरचा अहेरच मिळाला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने रोजगाराभिमुख प्रकल्पांवर मोठा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेत प्राण ओतण्यासाठी ५00 अब्ज रुपयांचे पॅकेज देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्याविषयी विचारता जेटली म्हणाले की, पंतप्रधानांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. ?केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सिन्हा यांच्या टीकेविषयी विचारता ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे.सरकारच्या सल्लागारांमुळे ही अवस्थाकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यशवंत सिन्हा यांचा हवाला देत मोदी सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपा व रा. स्व. संघ यांच्याशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघानेही सध्याच्या आर्थिक स्थितीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.केंद्र सरकारने जे आर्थिक सल्लागार नेमले आहेत, त्यांच्यामुळेच ही अवस्था ओढावली आहे, कामगारांचे रोजगार जात आहेत, बेरोजगारांना रोजगार मिळणे थांबले आहे, असेही भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपा