शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यशवंत सिन्हांमुळे विरोधकांना बळ; भारतीय मजदूर संघाचीही टीका, सरकारने दखल घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:17 IST

माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या नेत्यांनी मात्र खासगीत बोलताना यशवंत सिन्हा हे नैराश्यातून विधाने करीत आहेत, त्यांना सत्तेत स्थान न मिळाल्याचा हा परिणाम आहे, अशी विधाने केली.माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले की, या सरकारमुळे अच्छे दिन तर अजिबात आले नाहीत. त्यामुळे आता हे वाईट दिवस कधी जाणार, असे देशातील जनता विचारू लागली आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची जी दशा करून ठेवली आहे, त्याविषयी अर्थतज्ज्ञांनी न घाबरता बोलायलाच हवे. आपण गेले १८ महिने आर्थिक स्थितीबाबत सातत्याने बोलत आहोत. पण सरकारने दखल घेतली नाही. आता सिन्हा यांच्याकडून सरकारला घरचा अहेरच मिळाला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने रोजगाराभिमुख प्रकल्पांवर मोठा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेत प्राण ओतण्यासाठी ५00 अब्ज रुपयांचे पॅकेज देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्याविषयी विचारता जेटली म्हणाले की, पंतप्रधानांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. ?केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सिन्हा यांच्या टीकेविषयी विचारता ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे.सरकारच्या सल्लागारांमुळे ही अवस्थाकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यशवंत सिन्हा यांचा हवाला देत मोदी सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपा व रा. स्व. संघ यांच्याशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघानेही सध्याच्या आर्थिक स्थितीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.केंद्र सरकारने जे आर्थिक सल्लागार नेमले आहेत, त्यांच्यामुळेच ही अवस्था ओढावली आहे, कामगारांचे रोजगार जात आहेत, बेरोजगारांना रोजगार मिळणे थांबले आहे, असेही भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपा